HW News Marathi
मुंबई

संपादरम्यान बेस्टचे १९.८८ कोटींचे नुकसान

मुंबई | बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी सोमवार (७ जानेवारी) मध्य रात्री संपावर गेले होते. बेस्टचा हा संप नऊ दिवस सुरू होता. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपादरम्यान आठवड्याभरात १९.८८ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. बेस्ट समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत याबाबतचा अहवाल सादर करण्यात आला. संपकाळात शहरात एकूण दहा ठिकाणी बेस्टच्या बसेसवर दगडफेक झाली. यात सुमारे १७ बसेसचे नुकसान झाले. त्यामुळे बेस्टला ३७ हजार ३१८ रुपयांचा फटका बसला.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांनी बुधवारी (१६ जानेवारी) अखेर तब्बल ९ दिवसांनंतर संप मागे घेतला आहे. वडाळा डेपोत नुकत्याच झालेल्या बेस्ट कृती समितीच्या मेळाव्यात तब्बल ९ दिवस चाललेला हा संप मिटल्याची अधिकृत घोषणा बेस्ट कृती समितीचे नेते शशांक राव यांनी केली आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी

News Desk

गणेशोत्सवापूर्वी मुंबईतील सर्व खड्डे भरणार,आयुक्तांचे गणेशोत्सव मंडळांना आश्वासन

News Desk

इंजिनीअर्ससाठी भावीकाळात करिअरच्या नव्या संधी

News Desk