HW News Marathi
मुंबई

बेस्टच्या संपावर उच्च न्यायालयात नेमके काय घडले ? वाचा सविस्तर संभाषण

मुंबई | बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज (१५ जानेवारी) आठवा दिवस आहे. दरम्यान, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर आज तरी तोडगा निघणार का ? याप्रकरणी न्यायालयात दुपारी ३ वाजता सुनावणी सुरु झाली असून मुंबई उच्च न्यायालय नेमका काय निर्णय सुनावणार याच्याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. बेस्ट कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाने संप मागे घेण्याचे निर्देश दिले असून आजही या संपावर कोणताही तोडगा निघालेला नाही. उद्या सकाळी ११ वाजता पुन्हा या प्रकरणी उच्च न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयातील सविस्तर संभाषण

बेस्टचे वकील : उच्चस्तरीय समितीने सुचविलेल्या १० कलमी उपाययोजनांवर नक्कीच विचार केला जाऊ शकतो. उच्चस्तरीय समितीने सुचविलेल्या सर्व सूचनाचे बेस्टकडून स्वागत केले जाऊ शकते. याच १० कलमांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू केली जाऊ शकते. चर्चेला सुरूवात व्हावी, मात्र त्याआधी संघटनांनी हा संप मागे घ्यावा.

बेस्टचे वकील : आम्ही या सगळ्या मागण्या तत्वतः मान्य करत आहोत.

बेस्टचे वकील : आम्हाला इलेट्रिक बसेस घ्याव्याच लागतील, पण जर त्या ३१ मार्चच्या आधी नाही घेतल्या तर केंद्राचा ४० कोटींचा निधी परत जाईल आणि आमचं नुकसान होईल.

कृती समितीचे वकील : आमचा इलेट्रिक बसला विरोध नाही. मात्र त्या चालविण्यासाठी अन्य कामगारांची नियुक्ती केली जाईल याला आमचा विरोध आहे.

मुख्य न्यायमूर्ती : बदलत्या काळाप्रमाणे आपल्याला बदलायला हवं. उद्या सोलर बसेस येतील त्यालाही विरोध करणार का ?

कृती समितीचे वकील : नाही मुद्दा तो नाही. फक्त त्या बसेसमुळे कर्मचाऱ्यांवर नोकरी जाण्याची वेळ येऊ नये.

मुख्य न्यायमूर्ती : अहो पण तुमच्या अन्य बेरोजगार कर्मचाऱ्यांना कामाची संधी मिळाली तर यात चुकीचे काय ?

मुख्य न्यायमूर्ती : तुम्ही संप मागे घेता का ?

कृती समितीचे वकील : मला युनियनशी बोलावं लागेल. केवळ मी एकट्याने हा निर्णय घेऊ शकत नाही. या संपामध्ये किमान ४ ते ५ वेगवेगळ्या युनियन आहेत

मुख्य न्यायमूर्ती : असं कसं ? असंच उत्तर बेस्ट प्रशासन पण देऊ शकतं

बेस्ट वकील : मी आज ५ अधिकाऱ्यांना इथे सोबत ठेवले आहे. मग त्यांनी संपकऱ्यांना सोबत का बोलावलं नाही ?

महापालिका वकील : संपाची नोटीस फक्त एका युनियनने दिली आहे ५ नव्हे. संप मागे घ्यायलाच हवा

कृती समितीचे वकील :आम्हाला उद्यापर्यंतची वेळ द्या.

मुख्य न्यायमूर्ती : तुमच्याकडे अनेक पर्याय आहेत. उच्चस्तरीय समितीने देखील तुमच्या हिताच्या सूचना सुचविल्या आहेत. त्यामुळे दोघांनी चर्चा करून तोडगा काढावा. बेस्ट ,महापालिका वकील, महाधिवक्ता जो काही निर्णय घ्यायचाय तो आजच घ्या. आम्ही जो प्रस्ताव दिला आहे, तो आज संप मागे घेतला गेला तरंच लागू राहील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोवर संसर्ग : मुलांचे लसीकरण करुन घेण्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे आवाहन

Aprna

मध्यावधी निवडणुका झाल्या तरीही विजय आमचाच – अमित शहा

News Desk

अंबरनाथमध्ये शाळेच्या फिवाढी विरोधात विद्यार्थ्यांसह मनसेचं उपोषण

News Desk