HW News Marathi
मुंबई

भिडे गुरुजींच्या अटकेचा प्रश्न विधानसभेत

मुंबई | भि़डे गुरुजींना वाचवण्याची सरकारची भूमिका आहे. प्रकरण गंभीर असताना सरकार मात्र दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोपी विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

दरम्यान, महाराष्ट्रात अतिशय गंभीर प्रसंग घडत आहे. भिडे कार्यक्रम घेतात. पत्रकार परिषदा घेतात. परंतु पोलिसांनी ते सापडत नाहीत. हा प्रकार अतिशय गंभीर आहे. सरकार त्यांना पाठिशी का घालत आहे, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमकपणे विधानसभेत मांडला.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना लुटले

News Desk

मनोज मेहता यांचा मृत्यू, अंधेरी पुल दुर्घटनेत झाले होते जखमी

News Desk

राणेंची जागा नक्की कुठे – रावसाहेब दानवे सांगतील का?

News Desk
मुंबई

विधानसभा अध्यक्षांच्या अविश्वास ठरावाच्या मुद्यावरून दोन वेळा सभागृह तहकूब

News Desk

मुंबई | विधानसभा अध्यक्षांवर विरोधकांनी आणलेल्या अविश्वास ठरावाच्या मुद्यावरून विधानसभेचे कामकाज दोन वेळा तहकूब करण्यात आले. सत्ताधारी हे नियमानुसार आणि प्रथा-परंपरेच्या विरूद्ध कामकाज करत असल्याचा आरोप केला.

विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात आणलेल्या अविश्वास ठरावाची कोणतीही चर्चा न करता सत्ताधाऱ्यांनी विश्वास दर्शक ठराव आणून नियमाची पायमल्ली केली आहे. मुख्यमंत्री हे २००६ चा विलासरावांच्या वेळेसचा दाखला देतात. मात्र २००६ ला विलासराव देशमुख यांनी त्यांच्या मंत्रीमंडळावरील विश्वासदर्शक ठराव मांडला त्यांनी अध्यक्षांच्या बाजूने ठराव मांडला नव्हता.

आता आम्ही अध्यक्षांच्या विरूद्ध ठराव मांडला आहे. त्यामुळे २००६ ची आणि आताची तूलना होऊ शकत नाही असे सांगत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, अजित पवार यांनी या विषयावर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भाषणे केली.

यावेळी संसदीय कामकाजमंत्री गिरीष बापट आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन देतांन सांगितले की, आम्ही जे कामकाज करीत आहोत ते नियमानुसार केलेले असून त्यामध्ये कोणतेही चूकीचे काम केलेले नसल्याचे सांगत हा प्रश्न निकाली निघाला असल्याचे सभागृहात सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी निवेदन केल्यानंतर विरोधी पक्षांतील राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या आमदारांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्यामुळे सुरूवातीला १० मनिटीसाठी आणि त्यानंतर अर्ध्या तासासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.

Related posts

परप्रांतीयांनी काम न केल्याने मुंबई बंद पडणार नाही | आठवले

News Desk

डहाणूत मालगाडीच्या दोन डब्ब्यांना भीषण आग, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk

विज्ञानाच्या पुरस्कारासाठी ते उतरले रस्त्यांवर!

News Desk