HW News Marathi
मुंबई

विधानसभा अध्यक्षांच्या अविश्वास ठरावाच्या मुद्यावरून दोन वेळा सभागृह तहकूब

मुंबई | विधानसभा अध्यक्षांवर विरोधकांनी आणलेल्या अविश्वास ठरावाच्या मुद्यावरून विधानसभेचे कामकाज दोन वेळा तहकूब करण्यात आले. सत्ताधारी हे नियमानुसार आणि प्रथा-परंपरेच्या विरूद्ध कामकाज करत असल्याचा आरोप केला.

विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात आणलेल्या अविश्वास ठरावाची कोणतीही चर्चा न करता सत्ताधाऱ्यांनी विश्वास दर्शक ठराव आणून नियमाची पायमल्ली केली आहे. मुख्यमंत्री हे २००६ चा विलासरावांच्या वेळेसचा दाखला देतात. मात्र २००६ ला विलासराव देशमुख यांनी त्यांच्या मंत्रीमंडळावरील विश्वासदर्शक ठराव मांडला त्यांनी अध्यक्षांच्या बाजूने ठराव मांडला नव्हता.

आता आम्ही अध्यक्षांच्या विरूद्ध ठराव मांडला आहे. त्यामुळे २००६ ची आणि आताची तूलना होऊ शकत नाही असे सांगत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, अजित पवार यांनी या विषयावर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भाषणे केली.

यावेळी संसदीय कामकाजमंत्री गिरीष बापट आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन देतांन सांगितले की, आम्ही जे कामकाज करीत आहोत ते नियमानुसार केलेले असून त्यामध्ये कोणतेही चूकीचे काम केलेले नसल्याचे सांगत हा प्रश्न निकाली निघाला असल्याचे सभागृहात सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी निवेदन केल्यानंतर विरोधी पक्षांतील राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या आमदारांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्यामुळे सुरूवातीला १० मनिटीसाठी आणि त्यानंतर अर्ध्या तासासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विविध क्षेत्रातील अग्रेसर महिलांचा अभिमान! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

अधिकारी ब्रदर्स’चे गौतम अधिकारी यांचे निधन

News Desk

राज्य सरकारच्या कारभारावर जनतेचा भरोसा राहीला नाही

News Desk