HW News Marathi
मुंबई

भिवंडीत २६ मुलांना बिर्याणीतून विषबाधा

मुंबई – भिवंडीतील दारुल उलूम मदरशातील मटन बिर्याणीतून विषबाधा झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. २६ मुलांनावर उपचार सुरू असून ५ मुलांची प्रकृती चिंताजनक आहे. या पाच जणांना नायर रुग्णालयात हलवण्यात आले. दर्गारोड भागात मेहबूब संकुलनात मुस्लिम धर्मियांच्या अव्वल महिन्याच्या निमित्ताने बुधवारी ‘नियाज दावत’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या परिसरातील लहान मुले आणि दारुल उलूम मदरशातील मुलांना ही जेवणाचे निमंत्रण देण्यात आले होते. या दावतमध्ये मुलांनी मटन बिर्याणी खाल्यानंतर उलटी, जुलाब आणि चक्कर यांची तक्रार केल्यानंतर या सर्वाना ठाण्यातील सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी काही मुलांना ताप आणि आकडीचा त्रास होण्याची तक्रार केल्यानंतर तात्काळ मुंबईतील नायर रुग्णालयात नेण्यात आले. यात १३ ते १४ वयोगटातील २६ मुलांना विषबाधा झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

होय, मी अधिकाऱ्याला झापलं – महापौर महाडेश्वर

News Desk

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कोपर स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडे

News Desk

मानखुर्द येथे दोन वर्षीय चिमुरड्याचा नाल्यात पडून मृत्यू

swarit