HW News Marathi
मुंबई

राष्ट्रवादीचा गड असलेला पश्चिम महाराष्ट्रात भाजपचे वर्चस्व

मुंबई | “पश्चिम महाराष्ट्र हा एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा गड मानला जात होता. पण, राष्ट्रवादीचा गडावर भाजप सरकारने हा गड जिंकला असून पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे काँग्रेसचे बोटावर मोजण्या इतकेच आमदार आणि खासदार निवडून आले,” अशी टीका सीमाप्रश्नाचे समन्वय मंत्री चंद्रकात पाटील यांनी केली.

भाजप हा देशाली सर्वात मोठा पक्ष आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यचे आश्वासन अनेक राजकीय नेत्यांनी यांनी आधी जनतेला दिले होते. पण, शिव स्मारक बांधण्यासाठी भाजपने पुढाकार घेतला आहे. तसेच मराठा आरक्षणासाठी आणि शेतकऱ्यांचे कर्ज माफी यासाठी भाजप सरकाराने काम केले आहे. भाजपने सरकारमुळे ५० हजार शेतकऱ्यांची कर्ज माफी झाल्याचा दावा चंद्रकात पाटील यांनी महामेळाव्यात केला आहे.

भाजप आणि शिवसेनेच्या युतीचे संकेत

राष्ट्रवादी काँग्रेसने ‘हल्ला बोल’ यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेचा चौथा आणि अंतिम टप्पा सध्या सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी कोल्हापूरात ‘हल्ला बोल’ यात्रेत शिवसेनेला गांडुळाची उपमा दिली होती. ‘गांडुळाचे तोंड इकडे की तिकडे कळत नाही’ असे अजित पवार यांनी अशा शब्दात सेनेवर टीका केली होती.

पण, शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून ‘दुतोंड्या’ विषारी सापाची अवलाद आहात काय?’ अशा शब्दात टीका करून शिवसेना सारख्या मोठ्या पक्षावर टीकाकरून मोठे होण्याचा अजित पवारांचा प्रयत्न फसला. चंद्रकात पाटील यांनी शिवसेनेची बाजू मांडून भाजप युतीचे संकेत भाजप नेते चंद्रकात पाटील यांनी यावेळी दिले.

मुंबईत भारतीय जनता पार्टीचा ३८वा वर्धापन दिना निमित्ताने हा महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा महामेळावा वांद्रे कुर्ला क्रीडा संकुलातील एमएमआरडीए ग्राऊंडवर हा मेळावा होणार आहे. देशातील सर्व राज्यातून भाजप कार्यकर्ते या मेळाव्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. भाजपचे अध्यक्ष अमित शहा या मेळाव्यातील भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे. अमित शहा नेमके काय बोलणार आहेत. याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हार्दिक पटेलवर शाई फेक

News Desk

अंबरनाथमध्ये शाळेच्या फिवाढी विरोधात विद्यार्थ्यांसह मनसेचं उपोषण

News Desk

शेतकऱ्यांचा लाँग मार्च मोर्चाला माओवाद विचारसरणी डोकावत आहे | पूनम महाजन

News Desk