HW News Marathi
मुंबई

Breaking News | सीबीआयला सत्र न्यायालयाचा धक्का

मुंबई | नालासोपारा स्फोटक प्रकरणातील आरोपी असलेल्या शरद कळसकरचा ताबा मागणारा सीबीआयचा अर्ज आज सेशन्स कोर्टाने फेटाळला आहे. त्यामुळे सीबीआयला सत्र न्यायालया कडून मिळालेला हा मोठा धक्का मानला जात आहे. सीबीआयचा अर्ज कायदेशीर दृष्ट्या अयोग्य असल्याचे मत यावेळी न्यायालयाने व्यक्त केले आहे. नरेंद्र दाभोळकर खूण प्रकरणात चौकशीसाठी कळसकरचा सीबीआयला ताबा हवा होता. त्यामुळे या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी न्यायालयाकडे सीबीआयने शरद कळसकरचा ताबा मागितला होता.

सनातनच्या साधकांचा या प्रकरणात हात असल्याचे बोलले जात असल्यामुळे हे प्रकरण राज्यात अधिक गंभीर होताना पहायला मिळत आहे. तसेच या प्रकरणात नरेंद्र दाभोळकर, पत्रकार गौरी लंकेश, एम.एम. कलबुर्गी , गोविंद पानसरे यांसारख्या विचारवंतांच्या हत्येचे देखील दुवे सापडतील अशी आशा व्यक्त होत आहे. त्यामुळे नालासोपारा स्फोटक प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी सीबीआयने न्यायालयात शरद कळसकरचा ताबा मागितला असल्याची माहिती प्राप्त होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

चांदिवलीच्या म्हाडा कॉलनीत संरक्षण भिंत कोसळली

News Desk

विश्वास प्रस्तावावरून विधानसभेत प्रचंड गदारोळ

News Desk

राज्य सरकारच्या कारभारावर जनतेचा भरोसा राहीला नाही

News Desk
राजकारण

राहुल गांधींनी घेतले आरएसएसवर तोंडसुख

News Desk

नवी दिल्ली |पुणे पोलिसांनी मंगळवारी कोरेगाव-भीमा हिंसाचारासंबंधी देशामधील वेगवेगळ्या शहरात छापेमारीला सुरुवात केली आहे. या कारवाईदरम्यान बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यावेळी करण्यात आलेल्या या कारवाईवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. तसेच आरएसएसवर ट्विटरच्या माध्यमातून चांगलेच तोंडसुख घेतल्याचे पहायला मिळत आहे.

भाजपाच्या काळात देशात एकच सामाजिक संस्था राहु शकते जीचे नाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. बाकी सर्व सामाजिक संस्था बंद करा. बाकी सर्व समाजसेवकांना जेल मध्ये टाका. जे तक्रार करतात त्यांना गोळ्या घाला. नवीन भारतमध्ये आपले स्वागत आहे. # भीमाकोरेगांव आशा आशयाचे ट्विट करत पुन्हा एकदा राहुल गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तोंडसुख घेतला आहे.

Related posts

सुभाष देशमुख यांची तात्काळ हकालपट्टी करा | सचिन सावंत

News Desk

#Elections2019 : जाणून घ्या…गडचिरोली-चिमूर मतदारसंघाबाबत

News Desk

मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो !

News Desk