HW News Marathi
मुंबई

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, विठ्ठलवाडी-कल्याणदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली

मुंबई | मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. विठ्ठलवाडी-कल्याणदरम्यान ओव्हर हेड वायर तुटल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या आणि जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून चाकरमान्यांचे हाल झाले आहेत. यामुळे कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. आज (१७ जुलै) सकाळी ८.१० वाजताची अंबरनाथ-सीएसएमटी लोकल विठ्ठलवाडी स्थानकात ४० मिनिटांपासून थांबवण्यात आली आहे.

गेल्या दोन तास उलटून गेल्यानंतरही मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर आली नाही. रेल्वेचे कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मध्य रेल्वेची वाहतूक सतत होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे सर्वसामान्य प्रवाशांना हाल सहन करावे लागत आहेत. दर आठवड्याला मेगाब्लॉक घेऊनही रेल्वेच्या समस्या काही सुटत नाही. गेल्या काही आठवड्यात अनेकदा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने लोकांना त्रास सहन करावा लागला. पावसाच्या वेळी मध्य रेल्वेवरील सायन-माटुंगा दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचून बऱ्याचदा मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प होते.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोद्दार रुग्णालयातील गैरसोय झालेल्या रुग्णांची आदित्य ठाकरेंनी मागितली माफी

News Desk

विकासकामे वेळेत पूर्ण होण्यासाठी संबंधित विभागांनी प्रयत्नशील राहण्याची गरज! – दीपक केसरकर

Aprna

महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे अभ्यासवाटीकेची दुरावस्था

News Desk