HW News Marathi
मुंबई

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

कल्याण | मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. शनिवारी (८ डिसेंबर) सकाळी खडवली रेल्वे स्थानकाजवळ पॉइंट फेल झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सेवा कोलमडली आहे. यामुळे कल्याण-कसारा मार्गादरम्यानची वाहतूक तब्बल अर्धा तासाने उशिराने सुरू आहे. यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, हा बिघाड दुरुस्त झालेला असताना वाहतूक सेवा पुरती कोलमडली आहे. यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सावधान मुंबईकरांनो, चायनीज गाड्यांवर निकृष्ट दर्जाचे चिकन

News Desk

पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई

News Desk

भावी पोलिसांसाठी मनसे आली धावून

News Desk