HW News Marathi
मुंबई

महापालिकेविरोधात त्वरित फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा !

मुंबई | “मुंबई महानगरपालिकेच्या बेजबाबदार आणि निष्काळजीपणामुळे बुधवारी (१० जुलै) रात्री गोरेगाव पूर्व येथे अडीच वर्षाचा दिव्यांश सिंह मॅनहोलमध्ये पडला. या निष्काळजी मुंबई महापालिकेविरोधात त्वरित फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा”, अशी मागणी मुंबई काँग्रेसकडून करण्यात आली आहे. “दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत महापौरांना या घटनेबाबत माहिती नव्हती. हा तर निर्लज्जपणाचा कळस आहे”, अशी प्रतिक्रिया मुंबई काँग्रेसकडून देण्यात आली आहे.

“बुधवारी रात्री १० वाजता मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील आंबेडकर नगर येथे दिव्यांश सिंह नावाचा एक दीड वर्षाचा मुलगा मॅनहोलमध्ये पडला या घटनेला १२ तास होऊन गेले आहेत. तरीसुद्धा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आणि अग्निशमन दलाला त्या मुलाचा शोध घेता आलेला नाही. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना आज (११ जुलै) सकाळी ८ वाजेपर्यंत या दुर्घटनेबद्दल काहीही माहीत नव्हते. हा तर निर्लज्जपणाचा कळस आहे”, अशी प्रतिक्रिया मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष चरणसिंग सप्रा यांनी दिली आहे.

“मुंबई महापालिका जी आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिकाआहे, जिचे बजेट ३१ हजार कोटी रुपये आहे, ही महापालिका चालवणारे शिवसेना-भाजप सरकार दरवर्षी पावसाळ्यापूर्वी दावा करते की, मनपा पावसाळ्याला तोंड देण्यासाठी तयार आहे, नाल्यांची साफसफाई झालेली आहे, खड्डे भरण्यात आलेले आहेत, मॅनहोल उघडे नाहीत. पण प्रत्यक्षात मात्र हे दावे दरवर्षी पूर्णपणे फोल ठरतात. महापालिकेचे आणि जनतेचे करोडो रुपये याच नाल्यांमध्ये वाहून जातात”, असे आरोपही मुंबई काँग्रेसकडून करण्यात आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईची तुलना पटन्याशी सीएम यांना भोवणार का?

News Desk

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील पादचारी पूल कोसळला, ५ जणांचा मृत्यू

News Desk

रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प, मुंबई, ठाणेसह रायगडमध्ये रेड अलर्ट

News Desk