HW News Marathi
मुंबई

मुख्यमंत्र्यांनाच अटक करा संभाजी ब्रिगेडची मागणी

मुंबई | कोरेगाव- भिमा हिंसाचाराचा आरोप असलेल्या संभाजी भिडे यांना अटक करा, या मागणीसाठी आज मुंबईत भारिपकडून एल्गार रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. संभाजी ब्रिगेडने देखील या मोर्चाला पाठींबा दिला आहे.

भिडे गुरुजींना अटक न करण्याचे सरकारचे षडयंत्र असून त्यांना अटक होत नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच अटक करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते श्रीमंत कोकाटे यांनी केली आहे.

परीक्षा सुरु असल्यानं रॅली काढू नका, वाहतुकीला अडथळा करु नका, असं आवाहन पोलिसांनी प्रकाश आंबेडकरांना केलं आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वात काढण्यात येणाऱ्या या रॅलीला मुंबई पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. मात्र तरीही रॅली काढणार अस प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमिताभ बच्चन यांच्या हस्ते 28वा रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू

News Desk

लोकल घसरली; ३ जखमी

News Desk

नऊ तासांत तिनशे मिलिमीटर पाऊस

News Desk