HW News Marathi
मुंबई

मुंबईत १००० मुला-मुलींसाठी वसतीगृह सुरू करण्याची मागणी

मुंबई | आज मंत्रालयात मुंबई विभागात १००० मुला-मुलींच्या क्षमतेचे वसतीगृह सुरू करण्याबाबत सचिव दिनेश वाघमारे यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र व प्रादेशिक उपायुक्त, बाळासाहेब सोलंकी यांची भेट घेतली. मुंबईत अनेक विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सोय नाही म्हणून अर्धवट शिक्षण सोडून जावे लागते. तर काहींना भाडेतत्वावर मुलांना राहावे लागते. विद्यार्थ्यांच्या या समस्या लक्षात घेता मुंबईत अत्यंत गरजेच्या ठिकाणी १००० मुला-मुलींचे वसतीगृह तात्काळ सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

त्यामध्ये मुंबई वगळता अन्य ठिकाणी वसतीगृह सुरू करण्यात आली आहेत. मुंबईत उच्च शिक्षणासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून हजारो विद्यार्थी येतात. परंतु मुंबईसारख्या अत्यंत आवश्यकता असलेल्या ठिकाणी अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. संपुर्ण महाराष्ट्रात नवीन ७ विभागीय वसतीगृह ११ जुलै २०१२ रोजी सुरू करण्यात यावी असा निर्णय शासनाने घेतला होता.

याबाबत सचिव आणि प्रादेशिक उपायुक्तांना सांगितल्यानंतर मुंबई विभागतल्या अधिकार्यांशी व मंत्र्यांशी तत्काळ चर्चा करून एक-दोन महिन्यात भाडेतत्वावर चालू करण्यात येईल, असे सचिवांनी सांगितले आहे. येत्या डिसेंबरपर्यंत भाडेतत्वावर वसतीगृह चालू करण्यासाठी तयारी करण्याचे काम सुरु आहे, असे प्रादेशिक उपायुक्त सोलंकी यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईची तुंबई झाल्यास राज्यसरकार जबाबदार

News Desk

बेस्ट कर्मचाऱ्यांचा सलग तिसऱ्या दिवशी संप सुरूच, वडाळा आगाराला घेराव

News Desk

अॅड. उज्ज्वल निकम यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात

News Desk