HW News Marathi
मुंबई

मुंबईत १००० मुला-मुलींसाठी वसतीगृह सुरू करण्याची मागणी

मुंबई | आज मंत्रालयात मुंबई विभागात १००० मुला-मुलींच्या क्षमतेचे वसतीगृह सुरू करण्याबाबत सचिव दिनेश वाघमारे यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र व प्रादेशिक उपायुक्त, बाळासाहेब सोलंकी यांची भेट घेतली. मुंबईत अनेक विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सोय नाही म्हणून अर्धवट शिक्षण सोडून जावे लागते. तर काहींना भाडेतत्वावर मुलांना राहावे लागते. विद्यार्थ्यांच्या या समस्या लक्षात घेता मुंबईत अत्यंत गरजेच्या ठिकाणी १००० मुला-मुलींचे वसतीगृह तात्काळ सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

त्यामध्ये मुंबई वगळता अन्य ठिकाणी वसतीगृह सुरू करण्यात आली आहेत. मुंबईत उच्च शिक्षणासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून हजारो विद्यार्थी येतात. परंतु मुंबईसारख्या अत्यंत आवश्यकता असलेल्या ठिकाणी अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. संपुर्ण महाराष्ट्रात नवीन ७ विभागीय वसतीगृह ११ जुलै २०१२ रोजी सुरू करण्यात यावी असा निर्णय शासनाने घेतला होता.

याबाबत सचिव आणि प्रादेशिक उपायुक्तांना सांगितल्यानंतर मुंबई विभागतल्या अधिकार्यांशी व मंत्र्यांशी तत्काळ चर्चा करून एक-दोन महिन्यात भाडेतत्वावर चालू करण्यात येईल, असे सचिवांनी सांगितले आहे. येत्या डिसेंबरपर्यंत भाडेतत्वावर वसतीगृह चालू करण्यासाठी तयारी करण्याचे काम सुरु आहे, असे प्रादेशिक उपायुक्त सोलंकी यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

दक्षिण मुंबईत झाड कोसळल्याने वाहतूकीचा खोळंबा

News Desk

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड

News Desk

भिडे समर्थकांचा आज सन्मान मोर्चा

News Desk
महाराष्ट्र

मिरजमध्ये ‘माजी विद्यार्थी मेळाव्या’चे आयोजन

Gauri Tilekar

सांगली | मिरज येथील श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या शेट रतिलाल विठ्ठलदास गोसलिया ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन १८ नोव्हेंबर रोजी (रविवारी) एका ‘माजी विद्यार्थी मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने एका स्मरणिकेचे प्रकाशन देखील करण्यात येणार आहे. या स्मरणिकेसाठी अध्यापक विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांकडून ते कसे घडले, अध्यापक विद्यालयातील त्यांना आलेले अनुभव तसेच त्यांनी लिहिलेल्या कविता, गोष्टी याविषयीचे लेख पाठविण्यात येणार आहे.

‘अध्यापक विद्यालयाच्या स्थापनेपासूनच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी अर्जामार्फत नोंदणी करून आपले लेख अध्यापक विद्यालयात जमा करावेत,’ असे आवाहन माजी विद्यार्थी संघाने व प्राचार्य गौतम शिंगे केले आहे. दरम्यान,अध्यापक विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी नोंदणी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

संबंधित बातम्या

यंदा दिवाळीची शालेय सुट्टी २० दिवसांवरून १५ दिवसांवर

Related posts

CM ठाकरे यांनी मध्यरात्री जखमी जवानांशी साधला संवाद, गडचिरोली पोलिसांचे केले कौतुक!

News Desk

जरंडेश्वर तर हिमनगाचे टोक, अमित शाहांना पत्र लिहितोय, सगळी नावं समोर येतील!

News Desk

चिल्लर…थिल्लर, जे काही असेल त्याकडे बघायला मला वेळ नाही, मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

News Desk