HW News Marathi
मुंबई

पुण्यातील पाणी नियोजनावर विधानसभेत चर्चा

मुंबई | पुणे शहर हे त्यांच्या गरजेपेक्षा जास्त पाण्याचा वापर करत असल्याची कबूली जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आज विधानसभेत दिली. पुणे जिल्ह्यातील दौंड तालूक्यातील भामा आसखेड धरणासाठी शासनाने संपादित केलेल्या जमीनीच्या संदर्भात लक्षवेधी उपस्थित करण्यात आली होती.

यावेळी भामा आसखेड धरणातील पाणी हे पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड या दोन महापालिकांसाठी आरक्षण ठेवण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षण ठेवले असले तरी ज्या प्रमाणात आरक्षण आहे त्यापेक्षा जास्त पाण्याचा वापर या शहराकडून केला जात असल्याचा आरोप केला जात आहेत.

पुणे शहराची लोकसंख्या वाढत आहे. पुणे शहराची वाढ ही झपाट्याने होत आहे त्यामुळे भविष्यकाळात देखील पाण्याची मागणी वाढतच जाणार आहे मात्र आजच्या परिस्थितीतही पुणेकर हे मोठ्या प्रमाणावर पाणी वापरत असून पुणेकरांच्या पाणी वापराच्या संदर्भात जनजागृती करणे गरजेचे असल्याचा सुर विधानसभेत निघाला. पुणेकर हे जास्तीचे पाणी वापरत असल्याची कबूली राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी विधानसभेत दिली,

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई उपनगर जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांसाठी मोफत वाहन सुविधा

News Desk

नाणार प्रकल्पावर उद्धव मुख्यमंत्र्यात गुफ्तगु

swarit

यंदाचा मुंबई श्री किताब परेळच्या अनिल बीलावाने पटकावला

News Desk