HW News Marathi
मुंबई

रेल्वेने बांधलेल्या अर्धवट भिंतीमुळे चोरांना मार्ग मोकळा

मुंबई | कुर्ला पश्चिमेच्या हरियाणावाला लेन येथील तब्बल २० फुटांहून अधिक उंचीची भिंत ७ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास कोसळली होती. या दुर्घटनेत ३ नागरिक जखमी झाले होते. अमीर शैख असे यातील एक जखमी व्यक्तीचे नाव होते. या दुर्घटनेनंतर काही महिन्यात या पडलेल्या भिंतीचे काम रेल्वेकडून करण्यात आले. परंतु हे काम अद्यापही अपूर्ण आहे.

दरम्यान, या दुर्घटनेनंतर जवळील असलेली वसनजी पाचू चाळीलगत असलेली भिंत देखील धोकादायक असल्याने दुरुस्त करण्यास सुरुवात केली. परंतु तीन महिने उलटून गेले तरी ही संपूर्ण भिंत अजूनही दुरुस्त करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथील स्थानिकांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. गेल्या तीन महिन्यात या परिसरातील चोरीचे प्रमाण देखील वाढत आहे. त्यामुळे लवकरात लवकर रेल्वे प्रशासनाने ही भिंत संपूर्ण बांधून द्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

नेमकी काय आहे घटना ?

कुर्ला पश्चिमेच्या हरियाणावाला लेन येथील तब्बल २० फुटांहून अधिक उंचीची भिंत ७ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास कोसळली होती. या दुर्घटनेत ३ स्थानिक जखमी झाले होते. गेल्या काही महिन्यापासून ही भिंत कमकुवत झाल्याने एका बाजूला कलली होती. त्यामुळे या परिसरात राहणारे लोकांनी या संरक्षक भिंतीबाबत तक्रार दाखल केली होती. परंतु, या तक्रारकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्घटना घडली. या भिंतीच्या बाजुलाच चाळ असून यामुळे स्थानिकांचा चाळीत येण्या-जाण्याचा मार्ग बंद झाला होता. सकाळी ही भिंत कोसळली त्यावेळी या दुर्घटनेमध्ये जवळच असलेल्या दुकानदाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मेट्रोचे खांब उभारण्याची मागणी न्यायालयाने नाकारली

Gauri Tilekar

घर देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी, माहुल प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांना पाठवली पत्रे !

News Desk

श्रीमंत दगडूशेठ गणपतीला यंदा ४० किलो सोन्याचे दागिने!

News Desk