HW News Marathi
मुंबई

मुंबई पोलिसांमुळेच ‘ती’ सुखरूप घरी पोचली

मुंबई – मध्यरात्रीची वेळ … सुमसान रस्ते… रिक्षात एकटी महिला.. आणि पाठलाग करणारे दोन अज्ञात भामटे… एखाद्या चित्रपटात हा प्रसंग कितीही थरारक वाटतं असला, तरीही ज्या महिलेवर तो बेतला, तिची अवस्था काय झाली असेल.. याचा विचारच करवत नाही.

अंधेरीत राहणाऱ्या आणि माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या एका महिलेवर गुरुवारी मध्यरात्री 12 च्या सुमारास ही वेळ आली. पण हेल्पलाइनवर केलेल्या एका कॉलने अवघी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आणि 5 व्या मिनिटाला घटनास्थळी दाखल झाली. जुहू सर्कलवर पोलीस पथक दबा धरून बसले आणि महिलेला रिक्षा त्या दिशेने वळविण्यास सांगण्यात आले. तिने त्याप्रमाणे केले. समोर पोलीस दिसताच पाठलाग करणाऱ्यांची पाचावर धारण बसली आणि ते पार्ल्याच्या दिशेने पळून गेले.

केवळ पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि कारवाईमुळे काल रात्री सुखरूप घरी पोहचू शकले असे सांगत या महिलेने पोलिसांना लाख लाख धन्यवाद दिले. पोलिसांनी अगदी घरी पोहोचेपर्यंत महिलेची काळजी घेतली आणि घरी पोचल्याचा फोन आल्यावरच यंत्रणा पुन्हा रोजच्या कामाला लागली.

दरम्यान, याप्रकरणी आंबोली पोलिसांनी 354 ड कलमांतर्गत पाळत ठेवल्याचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. गेल्याच आठवड्यात अशाप्रकारची एक घटना उघडकीस आली होती. त्यात या नव्या घटनेची भर पडली आहे. त्यामुळे रात्री प्रवास करणाऱ्या महिलांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ शकतो त्यामुळे रक्तदान करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

swarit

काळाचौकीत डिजनीलॅण्ड नंतर यंदा छोटा भीम अवतरणार

swarit

मुकेश अंबानींचं निवासस्थान अँटिलियाच्या टेरेसवर आग

News Desk