HW News Marathi
मुंबई

एलफिन्स्टन अपघाताची रेल्वे पोलिसांनी जबाबदारी झटकली

मुंबई: एलफिन्स्टन रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीत २२ निष्पाप नागरिकांचे बळी गेले तर ३५ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची उच्चस्तरिय चौकशी करण्याचे आदेश रेल्वे मंत्र्यांनी दिले आहे. परंतु या प्रकरणीचा गुन्हा कोणी दाखल करायचा यावरून रेल्वे पोलिस, मुंबई पोलिस यांच्यात वाद झाला. अखेर रेल्वे पोलिसांनी आपली जबाबदारी झटकत ही घटना मुंबई पोलिसांकडे सुपूर्द केली आहे.

एलफिन्स्टन रेल्वे स्थानकातील निमुळत्या पादचारी पुलावर चेंगराचेंगरी होवून २२ जणांचा मृत्यू झाला. तर ३५ जण जखणी झाले. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले, तेव्हा पोलिसांत गुन्हा नोदंवण्याची आवश्यकता असते. तसे करताना रेल्वे पोलिस व मुंबई पोलिसांमधील मतभेद दिसून आहे. जोपर्यंत हद्दीचा विषय मार्गी लागत नाही, तोपर्यंत गुन्हा नोंदवू नका, असा आदेश रेल्वे विभागातील वरिष्ठांनी संबंधितांना दिला. तर मुंबई पोलिसांनीही हा प्रकार रेल्वेच्या हद्दीत घडल्याचे सांगत आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. दोघे जण एकमेंकावरील जबाबदारी झटकत असल्याचे दिसून आले. हा पूल महापालिकेच्या जागेवर बांधण्यात आला असल्याने तो महापालिकेच्या हद्दीत जातो, असे सांगत रेल्वे पोलिसांनी हात झटकले. हा गुन्हा मुंबई पोलिसांच्या हद्दीत येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, ही घटना रेल्वे विभागाच्या ताब्यातील पुलावर घडल्यामुळे रेल्वे पोलिसांनी याची दखल घेण्याची मागणी मुंबई पोलिसांनी केली होती. यावरून दोन्ही यंत्रणेत बराच वेळ खल सुरू होता. अखेर हा पूल महापालिकेच्या हद्दीत असल्याचे स्पष्ट झाल्याने मुंबई पोलिसांनी त्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. रेल्वे पोलिसांनी या घटनेतून हात झटकल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पानपट्यावर चॉकलेट, वेफर्स आणि बिस्किट विकण्यास बंदी

News Desk

कुर्ला एस.टी. आगारामध्ये ९ ऑगस्टला ‘चले जाव’ आंदोलन

News Desk

सांताक्रूझ येथे गुजराल हाऊसला आग

News Desk