HW News Marathi
मुंबई

शेतकऱ्यांची ‘थप्पड की गुंज’ सामनातून सरकारवर टीका

मुंबई | शेतकऱ्यांनी मुंबईत येऊन सत्ताधाऱ्यांना दिलेली ‘थप्पड की गुंज’ कायम स्वरुपी स्मरणात राहील आणि अन्नदाता शेतकरी आणि कष्टकरी यांच्या जीवनाची राखरांगोळी करण्याचे धाडस ते यापुढे तरी करणार नाहीत. बळीराजाने राज्यकर्त्यांना दिलेली ही शेवटची संधी आहे. मागण्यांचे पूर्ततेचे तुम्ही लेखी आश्वासन दिले आहे. ते तरी आता पाळ.’ अशी टीका शिवसेनेने त्यांच्या मुखपत्रातून केली.

शेतकऱ्यांच्या लाँग मार्च मोर्चातून नाशिकहून मुंबईत धडकलेल्या लाल वादळाने सरकारला मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे सरकाला त्यांच्या मागण्या मान्य करणे बंधनकारक होते. शेतकऱ्यांच्या लाँग मार्च मोर्चा हा आठवडाभर नाशिकहून मुंबईच्या दिशने पायी २०० कि.मीचा प्रवास करत मुंबईत दाखल झाला आहे. या मोर्चात राज्यातील विविध जिल्ह्यातील ४० हजारपेक्षा जास्त शेतकरी सामील झाले होते. शेतकऱ्यांच्या या विराट मोर्चाला राज्यातील मोठ्या पक्षानी पाठिंबा दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री अडचणीत भीडे, एकबोटेंवर कारवाई अशक्य

Adil

ऐतिहासिक वास्तू, संस्कृती, निसर्ग चित्रांचे प्रदर्शन

News Desk

घाटकोपर साई दर्शन इमारतीतील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधानांकडून प्रत्येकी दोन लाख

News Desk