HW News Marathi
मुंबई

अण्णाभाऊ साठेंच्या वारसदारांचे उद्यापासून उपोषण

उत्तम बाबळे

मुंबई :- ‘ये आझादी झुटी है, देश की जनता भूखी है!’ म्हणत सत्यशोधक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी १६ ऑगस्ट १९४७ रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे मोर्चा काढला होता. या आंदोलनास ७० वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्याने साधूनसमाजाच्या विविध मागण्यांसाठी अण्णाभाऊंचे वारसदार उद्या बुधवारपासून तीन दिवस आझाद मैदान येथेच उपोषण करणार आहेत.

आद्य क्रांतीगुरू लहुजी साळवे, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छ.राजर्षी शाहू महाराज, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, आद्य क्रांतीगुरू लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग अहवालाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, चिरागनगर घाटकोपर, मुंबई येथील अण्णाभाऊ साठे यांचे घर राष्ट्रीय स्मारक घोषित करावे, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळास त्वरीत अध्यक्ष नियुक्त करावा, बोधेगाव, जि. अहमदनगर येथील अण्णाभाऊ साठे यांच्या अस्थी असलेल्या समाधीस राष्ट्रीय स्मारक घोषित करावे, लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जातीचे अ, ब, क, ड नुसार वर्गीकरण करण्यात यावे, आदी अनेक मागण्यांसाठी १६ ते १८ ऑगस्ट हे उपोषण करण्यात येणार आहे.

यात अण्णाभाऊ साठे यांच्या धाकट्या भगिनी जाईबाई भगत, सुनबाई सावित्री मधुकर साठे, नातू सचिन साठे, नाती सुवर्णा मधुकर साठे, सौ. ज्योती भगत साठे हे या उपोषणात सहभागी होणार आहेत. या उपोषणासंदर्भातचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींना पाठविण्यात आले आहे. या उपोषणास राज्यातील विविध सामाजिक संघटना व समाज बांधवांतून पाठिंबा मिळत असून, यात बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समाज भूषण सतीश कावडे, संपादक उत्तम बाबळे, यादव सुर्यवंशी, केरबाजी देवकांबळे, नामदेव वाघमारे, शाहीर माधव वाघमारे कृष्णूरकर, पत्रकार अरुण डोईफोडे आदींनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोस्टल क्लीनअप डे’चा उत्साह, श्रमदानाने युवकांनी केली दादर चौपाटीची स्वच्छता

News Desk

खडसेंना फसविण्याचा दमानियांचा कट

Adil

४० हजार अन्नदात्याचा आपल्या हक्कासाठीचा खडतर प्रवास थेट सरकारकडे, त्यापैकी ९० टक्के मागण्यांवर निवारण

News Desk