HW News Marathi
मुंबई

डोंबिवलीमध्ये एमआयडीसीतील झेनिथ रबर कंपनीला आग

डोंबिवली | एमआयडीसी परिसरातील झेनिथ रबर कंपनीला सोमवारी मध्यरात्री आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

 

अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आण्याचे प्रयत्न सुरू आहे. आगीची माहिती मिळताच केडीएमसीच्या महापौर विनिता राणे, नगरसेवक विश्वानाथ राणे आदींनी घटनास्थळी दाखल झाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आता पश्चिम रेल्वेच्या महिला डब्ब्यावर दिसणाऱ्या ‘स्त्री’चा लोगो बदलला

News Desk

‘वारा’ संस्थेतर्फे सॅनेटरी नॅपकीनचे मोफत वितरण

swarit

अधिकारी ब्रदर्स’चे गौतम अधिकारी यांचे निधन

News Desk
क्रीडा

भारतीय महिला संघाचे टी-२० वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत स्थान निश्चित

News Desk

मुंबई | भारतीय महिला संघाने टी-२० वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत आयर्लंड संघावर ५२ धावांनी मात करुन उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. भारतीय महिला संघाचा हा सलग तिसरा विजय आहे. मिताली राजच्या अर्धशतकानंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारतीय महिला संघाने हा विजय मिळवला. या आधीच्या दोन लढतींत भारताने न्यूझीलंड आणि पाकिस्तानवर मात केली होती. दरम्यान, भारताचा साखळीतील शेवटचा सामना शनिवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होत आहे.

आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मिताली राज आणि स्मृती मानधना यांनी १० षटकांत ६७ धावांची सलामी दिली. स्मृतीने २९ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारसह ३३ धावा केल्या. स्मृतीने मागील दोन लढतींत २६ आणि २ धावा केल्या होत्या. यानंतर इतर फलंदाजांकडून फटकेबाजीची अपेक्षा होती. मात्र, जेमिमा रॉड्रिगेज तीन चौकार मारून माघारी परतली. हरमनप्रीत कौरलाही मोठी खेळी करता आली नाही. वेदा कृष्णमूर्तीने पुन्हा एकदा निराशा केली. डी. हेमलताही चार धावांवर धावबाद झाली. मिताली राजने एकाबाजूने किल्ला लढविला. तिने ५६ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारसह ५१ धावा केल्या. मितालीचे हे सलग दुसरे अर्धशतक ठरले आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय टी-२०मधील हे तिचे १७वे अर्धशतक ठरले.

लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडच्या महिलांना भारतीय गोलंदाजांचा समाचार घेण्यात अपयश आले. लेविस ९ धावांवर बाद झाल्यानंतर शिलिंग्टन आणि जॉयसने डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा; पण ही जोडी फुटली आणि आयर्लंडच्या फलंदाजांनी भारतीय महिलांसमोर शरणागती पत्करली. भारताने दिलेल्या १४६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडला ८ बाद ९३ धावाच करता आल्या. भारताकडून राधा यादवने तीन विकेट घेतल्या.

Related posts

फ्रेंच ओपनमध्ये राफेल नदालचं अकरावं विजेतेपद

News Desk

Asia Cup 2018 | विराट ऐवजी रोहित शर्मा करणार नेतृत्त्व

News Desk

आचरेकर सरांनी मला जगायला शिकविले !

News Desk