HW News Marathi
मुंबई

वांद्रे येथील आग आटोक्यात

मुंबई | मुंबईमधील वांद्रे पश्चिम येथील नागरदास रोडजवळील निर्मला झोपडपट्टीला आज (मंगळवार) सकाळी साडेदहाच्या सुमारास भीषण आग लागली होती. ती आग आटोक्यात अली असून ७० झोपड्या जळून खाक तर ३ जण जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.आठ ते दहा सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागली असल्याची माहिती मिळत आहे. ही आग विजवण्यासाठी अग्निशमन दलाच्या २० गाड्या घटनास्थळी पोहचल्या होत्या. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.

सध्या त्या ठिकाणी कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. लाकडी आणि बांबूच्या झोपड्या असल्याने आग वेगाने पसरली होती. आजूबाजूच्या परिसरात फर्निचरचे दुकान, मस्जिद तसेच जवळच लकी हॉटेल असल्याने ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात येत होते. येथे अत्यंत छोट्या छोट्या गल्ल्या असल्याने आगीवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले होते. त्यामुळे तिथल्या पुलावर उभे राहून अग्निशमन दलाने आग विजवली आहे. तसेच स्थानिक रहिवाश्यांनी देखील आपल्यापरीने आग विजवण्याचा प्रयत्न केला होता.

निर्मल झोपडपट्टीमध्ये दोन ते तीन वर्षांपूर्वीही अशीच आग लागली होती. तेथे हजारो लोक राहतात. तसेच त्या झोपडपट्टीत लघु उद्योग देखील चालविले जातात.अनधिकृत बांधकामांना पाठिंबा देणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली आहे. तसेच ही आग लागण्याचे नेमके कारण काय याची कसून चौकशी केली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबई महापालिका कर्मचा-यांची दिवाळी गोड, बोनस जाहीर

News Desk

नेदरलँडची राणी मॅक्झीमा डबेवाल्यांच्या भेटीला

News Desk

मुंबईला पावसाने झोडपले

News Desk
राजकारण

भारताची राजधानी वायू प्रदूषणाच्या विळख्यात

News Desk

नवी दिल्ली | भारतात वायू प्रदूषणामुळे २०१६ मध्ये तब्बल १ लाख २५ हजार लहान मुले दगावली आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालातून समोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या या अहवालात जगातील एकूण पाच देशांची नावे आहेत. या पाच देशांमध्ये भारताचे देखील नाव आहे. भारतात प्रदुषणाचे प्रमाण अधिक आहे. मुख्यतः राजधानी दिल्लीत प्रदूषणाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे या अहवालात म्हटले आहे. भारतात विशेषतः स्वयंपाकघरात आणि घराबाहेर निर्माण होणारे वायूचा गंभीर परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर दिसून येत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या या अहवालानुसार, दारिद्र्यरेषेखालील अणि मध्यमवर्गीय देशांमध्ये ५ वर्षांपेक्षा देखील कमी वय असलेल्या तब्बल ९८ टक्के मुलांना वायू प्रदूषणातून निर्माण झालेल्या हवेतील सूक्ष्म कणांमुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने जगभरातील वायू प्रदूषण, बाल आरोग्य आणि स्वच्छ हवा या मुद्द्यांच्या संदर्भांत एक अहवाल सादर केला होता.

जागतिक वायू प्रदूषणाबाबत ग्रीनपीसनेही एक अहवाल सादर केला आहे. ग्रीनपीस यांनी जारी केलेल्या अहवालात भारताच्या प्रदूषण पातळीचे खूपच भयानक असल्याचे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने जागतिक आरोग्य संघटनेचा हा वायू प्रदूषणाबाबतचा अहवाल सादर झाल्यानंतर दिल्ली आणि देशातील इतर राजधानी क्षेत्रांत प्रदूषणांची स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे म्हणत तातडीने पावले उचलण्याची गरज असल्याचे सांगितले आहे.

Related posts

शिवसेना आगामी निवडणुका स्वबळावर लढणार | संजय राउत

News Desk

तब्बल 9 महिन्यानंतर राज्याच्या सत्तांतरवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी संपली; निकालाची प्रतिक्षा

Aprna

काँग्रेसला मोठा धक्का! राहुल गांधींची खासदारकी रद्द; काय आहे प्रकरण?

Aprna