HW News Marathi
मुंबई

वांद्रे येथील आग आटोक्यात

मुंबई | मुंबईमधील वांद्रे पश्चिम येथील नागरदास रोडजवळील निर्मला झोपडपट्टीला आज (मंगळवार) सकाळी साडेदहाच्या सुमारास भीषण आग लागली होती. ती आग आटोक्यात अली असून ७० झोपड्या जळून खाक तर ३ जण जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.आठ ते दहा सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागली असल्याची माहिती मिळत आहे. ही आग विजवण्यासाठी अग्निशमन दलाच्या २० गाड्या घटनास्थळी पोहचल्या होत्या. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.

सध्या त्या ठिकाणी कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. लाकडी आणि बांबूच्या झोपड्या असल्याने आग वेगाने पसरली होती. आजूबाजूच्या परिसरात फर्निचरचे दुकान, मस्जिद तसेच जवळच लकी हॉटेल असल्याने ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात येत होते. येथे अत्यंत छोट्या छोट्या गल्ल्या असल्याने आगीवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले होते. त्यामुळे तिथल्या पुलावर उभे राहून अग्निशमन दलाने आग विजवली आहे. तसेच स्थानिक रहिवाश्यांनी देखील आपल्यापरीने आग विजवण्याचा प्रयत्न केला होता.

निर्मल झोपडपट्टीमध्ये दोन ते तीन वर्षांपूर्वीही अशीच आग लागली होती. तेथे हजारो लोक राहतात. तसेच त्या झोपडपट्टीत लघु उद्योग देखील चालविले जातात.अनधिकृत बांधकामांना पाठिंबा देणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली आहे. तसेच ही आग लागण्याचे नेमके कारण काय याची कसून चौकशी केली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाणे बदलत असल्याचे दृश्य परिणाम दिसू लागले आहेत! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

मुंबई महापालिकेचा ३० हजार ६९२ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर

News Desk

प्रकाश दरेकर विरोधात गुन्हा दाखल

News Desk