HW News Marathi
मुंबई

भिवंडीत राजलक्ष्मी कंपाउंडमध्ये भीषण आग

ठाणे | मुंबईतील अग्निकांडाचे सत्र सुरूच असल्याचे चित्र दिसत आहे. कामगार रुग्णालयाला काल (१७ डिसेंबर) आग लागली तर आज (१८ डिसेंबर) दुपारी ३. १५ वाजताच्या सुमारास भिवंडीतील काल्हेर परिसरातील राजलक्ष्मी कंपाउंड येथे भीषण आग लागली. आगी लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी भिवंडी अग्निशमन दलाचे १ फायर वाहन व ठाणे अग्निशमन केंद्राचे बाळकूम येथील १ जंबो वॉटर टँकर, वागळे अग्निशमन केंद्राचे १ फायर वाहन दाखल झाले आहे.

अग्निशमन दलाच्या जवानांचे आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. पुठ्याचे गोदाम असल्याने आगीचा भडका वाढला आणि आग पसरत गेली. परंतु, अग्निशमन दलाचे आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आग लागल्याचे कारण अद्याप कळाली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

गोखले पुलाचा ढिगारा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

News Desk

सोनिया गांधींच्या विरोधात केलेल्या विधनाबाबत मुंबईत उद्या अर्नब गोस्वामींची पुन्हा चौकशी होणार

News Desk

शाहरुख-गौरीने केले ४ मजली कार्यालय पालिकेकडे सुपूर्द

News Desk
मुंबई

मुंबईतील पायाभूत सोयी-सुविधांबाबत पंतप्रधान मोदींनी केले भाष्य

News Desk

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (१८ डिसेंबर) कल्याण मेट्रो प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. सोहळ्यात संबोधित करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबई शहराच्या पायाभूत सुविधांवर असलेल्या ताणाबाबत भाष्य केले आहे. “आज मुंबईचा विस्तार होत आहे. चहू दिशांनी विकास होत आहे. परंतु, त्याचबरोबर येथील पायाभूत सोयी-सुविधांवरील ताण देखील मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. विशेषतः येथील वाहतूक यंत्रणा, रस्ते आणि लोकल रेल्वे यंत्रणेवर अधिक ताण आहे”, असेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी म्हटले.

कल्याण मेट्रो प्रकल्पाच्या भूमिपूजना व्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या या एक दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यात जवळपास ४१,००० कोटींच्या गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधांच्या संदर्भातील योजनांचा शुभारंभ केला आहे. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १८,००० कोटी रुपये खर्चून ८९,७७१ इतकी घरे बांधण्यात आली आहेत.

दरम्यान, या मेट्रो भूमिपूजन सोहळ्यात मुंबई मेट्रो प्रकल्पावरून काँग्रेसवर तोफ डागली आहे. मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी काँग्रेस सरकारने खूप वेळ लावला, असा आरोप मोदींनी यावेळी केला आहे.

Related posts

सरकारच्या नियोजनशुन्यतेमुळेच तुर उत्पादक शेतकर्‍यांचे हाल – मुंडे

News Desk

बोटीतून गरोदर महिलेला रुग्णालयात पोहचवले

News Desk

लोकल ट्रेनमधून ६ वर्षात तब्बल ६० हजार मोबाइल लंपास

News Desk