HW News Marathi
मुंबई

मुंबईतील पायाभूत सोयी-सुविधांबाबत पंतप्रधान मोदींनी केले भाष्य

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (१८ डिसेंबर) कल्याण मेट्रो प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. सोहळ्यात संबोधित करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबई शहराच्या पायाभूत सुविधांवर असलेल्या ताणाबाबत भाष्य केले आहे. “आज मुंबईचा विस्तार होत आहे. चहू दिशांनी विकास होत आहे. परंतु, त्याचबरोबर येथील पायाभूत सोयी-सुविधांवरील ताण देखील मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. विशेषतः येथील वाहतूक यंत्रणा, रस्ते आणि लोकल रेल्वे यंत्रणेवर अधिक ताण आहे”, असेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी म्हटले.

कल्याण मेट्रो प्रकल्पाच्या भूमिपूजना व्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या या एक दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यात जवळपास ४१,००० कोटींच्या गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधांच्या संदर्भातील योजनांचा शुभारंभ केला आहे. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १८,००० कोटी रुपये खर्चून ८९,७७१ इतकी घरे बांधण्यात आली आहेत.

दरम्यान, या मेट्रो भूमिपूजन सोहळ्यात मुंबई मेट्रो प्रकल्पावरून काँग्रेसवर तोफ डागली आहे. मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी काँग्रेस सरकारने खूप वेळ लावला, असा आरोप मोदींनी यावेळी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Parel Fire | चिमुरडीने वाचवले कुटुंबियांचे प्राण

News Desk

खड्यात उतरून शिवसैनिकांचे आंदोलन  

News Desk

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk
मनोरंजन

FLASHBACK 2018 : आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा

News Desk

आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी १० डिसेंबर २०१८ रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि केंद्र सरकार यांच्यात सुरू असलेला वाद संपुष्टात न आल्याने आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी १० डिसेंबरला आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची शक्यता वर्तविली गेली. मात्र, उर्जित पटेल यांनी आपल्या राजीनाम्यात वैयक्तिक कारणाने राजीनामा देत असल्याचे म्हटले. रिझर्व्ह बँकेकडून अंधाधुंद कर्जवाटप झाल्याने केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आरबीआयला फटकारले होते.

केंद्र सरकारने आरबीआय अॅक्टमधील कलम ७ चा वापर केल्याने रिझर्व्ह बँकेतील अधिकाऱ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. कलम ७ लागू केल्याने केंद्र सरकारला विशेष अधिकार मिळतात. याअंतर्गत सरकार गव्हर्नरला कोणतेही निर्देश देऊ शकतात. भारतात स्वातंत्र्यानंतर या कलमाचा प्रथमच वापर करण्यात आला होता.

माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मोदीप्रणित भाजप सरकारचा रोष पत्करून घेत देशात आर्थिक विकासाचे धोरण राबविले होते. मात्र, त्यामुळेच दुखावलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने राजन यांना दुसरी टर्म न देता गव्हर्नरपदी गुजराती माणूस म्हणून उर्जित पटेल यांना संधी दिली. मात्र, नोटबंदी आणि इतर निर्णयाने पटेल यांच्या काळात ही महत्वाची मध्यवर्ती बँक केंद्र सरकारची कळसूत्री बाहुली असल्याची टीका जागतिक स्तरावरून झाली. तसेच आर्थिक निर्णयात अखेर बँक व सरकार यांचे खटके उडू लागले होते. त्यामुळेच मागील महिन्यात पटेल राजीनामा देतील अशी बातमी पसरली होती. मात्र, त्यावेळी सर्व शांत असल्याचे भासविण्यात सरकार व आरबीआय यशस्वीही झाले. मात्र, अखेर पटेल यांनी राजीनामा दिला.

Related posts

ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर आणि तबला वादक विनायक थोरात यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान

News Desk

…हे नवीन गाणे ट्रेंड स्थापित करण्यास सज्ज

News Desk

पारंपरिक तिळाच्या वड्या

News Desk