HW News Marathi
मुंबई

कांदिवलीत जीन्स फॅक्टरीला लागलेल्या आगीत ४ जणांचा मृत्यू

मुंबई | कांदिवली पूर्वे येथील दामू नगर परिसरातील जीन्स फॅक्टरीला रविवारी (२३ डिसेंबर) भीषण आग लागल्याची घटना घडली होती. या आगीत चार जणांचा मृत्यू झाला आहे. ही आग विझल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना चार जणांचे मृतदेह सापडले आहेत. ४ फायर इंजिन आणि ४ वॉटर टँकरच्या सहाय्याने ही आग विझवण्यात आली होती. त्यावेळी जीवितहनीची झाली नसल्याची माहिती समोर आली होती. परंतु आग विझल्यानंतर अग्निशमन दलाला चार मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली आहे.

रविवारी गोदामांना आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. जवानांच्या प्रयत्नानंतर काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यास जवानांना यश आले होते. परंतु ही आग विझवल्यानंतर चार जणांचे मृतदेह सापडले आहेत. राजू विश्वकर्मा (३०), राजेश विश्वकर्मा (३६), भावेश पारेख (५१), सुदामा लल्लनसिंग (३६) अशी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. हे चार ही जण गोदामात काम करणारे कर्मचारी असून काम करताना अचानक आग लागल्यामुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘कोरोना’चा फटका आयपीएलला बसणार?

swarit

महालक्ष्मी रेसकोर्स येथे भरधाव मर्सिडीजने एका पादचाऱ्याला चिरडले

News Desk

“युवाशक्तीने पूर्ण ताकदीने काम करुन काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करुन देण्यात योगदान दिले पाहिजे “- नाना पटोले

News Desk