HW News Marathi
मुंबई

घाटकोपर विमान दुर्घटना आणि ते दोघे

घाटकोपर | घाटकोपरमध्ये गुरुवारी झालेल्या चार्टर्ड विमान अपघातात वैमानिकासह ५ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान अपघात ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या एका पादचा-याचा मृत्यू झाला तर २ जण जखमी झाले. अचानक झालेल्या अपघातामुळे परीसरातील लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या दुर्घटनेत जखमी झालेल्या दोन युवकांशी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी संवाद साधला तेव्हा त्यानी सविस्तर घटनेची माहिती दिली आहे. जखमी झालेले नरेशकुमार निशाद म्हणाले, मी मूळचा छत्तीसगडचा रहिवाशी असून घोटकोपर येथील एमटीएनएल येथे राहतो. पत्नीसह दुर्घटना घडलेल्या घटनास्थळी कामगार असल्यामुळे गुरुवारी या ठिकाणी उपस्थित होतो. घटना घडली त्यावेळी जेवणाची वेळ झाल्याने सर्व कामगार जेवायला तळघरात गेले होते. यावेळी ६० ते ७० कामगार घटनास्थळी हजर होते. अचानक समोरून विमान माझ्या दिशेने येताना दिसल्याने मी तिथून उडी घेतली मात्र स्फोट झाल्याने आगीचालोळ माझ्या चेहऱ्यावर आला त्यात मी जखमी झाले अशी महिती नरेशकुमार यांनी दिली. त्यानंतर प्रचंड आवाज झाल्याने तळघरातील कामगार वर आले. नरेशकुमार यांचे मामा कौशल यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले.

नरेशकुमार यांच्यासह जखमी झालेला दुसरा व्यक्ती लवकुश कुमार हा तो मूळचा इलाहाबादचा रहिवाशी आहे. दुर्घटना घडली त्यावेळी मी जेवणासाठी तळघरात जात होतो. त्यावेळी समोरून विमान येत असताना दिसल्याचे लवकुश कुमार याने सांगितले. त्यावेळी तळमजल्याच्या दिशेने धावत असताना पडल्याने जखमी झाल्याचे त्याने सांगितले. त्याच्या पायाला जखम झाली आहे. घटनेनंतर थोड्या वेळात या दोघांवर औषध उपचार करण्यात आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ईद मिलाद-उन-नबी या दिवशी राणीबाग नागरिकांकरीता खुली राहणार 

News Desk

जेएनयूतील घोषणाबाजीच्या वादावेळी मी तिथे नव्हतोच | कन्हैय्या कुमार

News Desk

गणेशोत्सव मंडळांना दिलासा, मंडपांसाठी मुदतवाढ

News Desk
मुंबई

करी रोड, एल्फिन्स्टन ब्रिज १५ दिवसांसाठी ‘वन वे’

swarit

मुंबई | करी रोड आणि एल्फिन्स्टन पुलावरील वाहतुकीत पोलिसांनी बदल केला आहे. वाहनांनी सदैव गजबजलेल्या या परिसरातील वाहतूक आता १५ जूनपर्यंत वन वे केली आहे. अचानक पोलिसांनी हा प्रयोग हाती घेतल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास आणि गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. सध्या वाहनचालकांना पाच मिनिटांच्या प्रवासाकरिता १५ ते २० मिनिटे प्रवास करत वळसा मारून इच्छितस्थळी जावे लागत आहे.

वाहतूक सुरळीत ठेवण्याबरोबर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी करी रोड आणि एल्फिन्स्टन पुलावरील वाहतुकीत १५ दिवसांसाठी बदल केला आहे. प्रभादेवी, एल्फिन्स्टनला जाण्यासाठी करी रोड पूल हा वन वे केला असून त्या ठिकाणाहून हिंदमाता, परळमध्ये येण्यासाठी एल्फिन्स्टन पूल वन वे केला आहे. १ जून पासून १५ दिवस २४ तासांसाठी हा प्रयोग हाती घेण्यात आला आहे, मात्र हे गैरसोयीचे असल्याचे म्हणत या वन वे विरोधात एल्फिन्स्टन येथील नागरिकांनी विरोध दर्शविल्याचे पहायला मिळत आहे.

Related posts

नीट परीक्षेसाठी लढा देणाऱ्या तरूणची आत्महत्या

News Desk

दबंग शिवदीप लांडेंची धडक कारवाई

News Desk

विद्यार्थ्यांनी सीएसएमटी येथे अनोख्या पद्धतीने साजरा केला स्वातंत्र्य दिन

News Desk