HW News Marathi
मुंबई

तृतीय पंथीयांना एक टक्का आरक्षण द्या

मुंबई | तृतीय पंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक टक्का आरक्षण द्यावे, अशी मागणी ठाणे महानगर पालिकेच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केली आहे. शिंदे यांनी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना पत्रही लिहले आहे.

तृतीय पंथी म्हटले की, ते सिग्नलवर, रेल्वेत किंवा एखाद्या बाजारपेठेत टाळ्या वाजवून पैसे मागणाऱ्या आणि लोकांना पैसे दिल्यानंतर ते आशिवार्द देतात, असे चित्र आपल्या डोळ्यासमोर येतात. आपण सर्व जण त्यांना सहानभूतीने पैसे देतात.

तृतीय पंथीयांना मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. या सगळ्यातून तृतीयपंथीयांना बाहेर काढून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणावे, आणि त्यांनाही सन्मानाने जगता यावे, यासाठी ठाणे महापालिकेच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सीएनजी, पीएनजीचे भाव वधारले

News Desk

वांद्रे गरीबनगरमध्ये 4 सिलेंडरचा स्फोट, भीषन आग, 22 गाडया घटनास्थळी, video

News Desk

मराठा आंदोलनात फूट पाडल्याचा आरोप राजकीय हेतूने

News Desk