HW News Marathi
मुंबई

गोखले पूल दुर्घटनेनंतर रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लुट

मुंबई | अंधेरी- विलेपार्ले दरम्यान असलेल्या पादचारी गोखले पुलाचा काही भाग मंगळवारी सकाळी कोसळताच परीसरातील रिक्षाचालकांनी नेहमीप्रमाणे संधीचा फायदा घेतला. वेस्टर्न रेल्वे ठप्प झाल्याने अनेकांना कार्यलयात पोहचण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला. अनेकांनी कार्यलय गाठण्याची धावपळ केल्याने रिक्षावाल्यांनी सुद्धा हात धुवायला सुरुवात केल्याचे चित्र पहायला मिळाले. अंधेरी ते बांद्रा हे अंतर केवळ 150 रुपयात सहज गाठता येते परंतु प्रवाशांची अडचण लक्षात येताच रिक्षावाल्यांनी शेअरिंग स्वरूपात प्रत्येक प्रवाशांकडून 100 रुपये घ्यायला सुरुवात केली होती. त्यामुळे जो प्रवास 150 रुपयांपर्यंत होतो त्याचसाठी आज रिक्षावाल्यांनी 300 रुपयांची मागणी करत प्रवाशांची लूट केली.

प्रसंगी दुसरा पर्यायच उपलब्ध नसल्यामुळे अनेकांनी ऑफिसला लवकर पोहचण्याच्या आशेने वाट्टेल ती किंमत मोजल्याचे दिसून आले. ज्या शहरांवर आणि प्रवाशांवर रिक्षावाल्यांचे घर चालत तोच मुंबईकर जेव्हा घराबाहेर पडून प्रवासाला निघतो तेव्हा प्रवासादरम्यान एखाद संकट याच प्रवाशांवर येते तेव्हा हेच रिक्षाचालक त्याला संधी समजून अधिक पैसे उकळतात हा दरवेळचा मुंबईकरांचा अनुभव आहे. त्यामुळे शहरात अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच प्रामाणिक रिक्षाचालक राहिले आहेत की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मध्य आणि पश्चिम रेल्वेत एस्क्लेटर घोटाळा

News Desk

पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान ‘या’ विकासकामांचे होणार लोकार्पण

Aprna

मुंबईतील आठ पोलीस स्टेशनची धुरा महिला अधिकाऱ्यांच्या हाती

News Desk
महाराष्ट्र

कल्याणमधून 7 नक्षवाद्याना अटक, भीमा कोरेगाव प्रकरणात सामिल?

swarit

कोरेगाव-भीमा हिंसाचारात हात? कल्याणमधून अटक करण्यात आलेल्या 7 नक्षलवाद्यांवर संशय

राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी कल्याणमधून ७ नक्षलवाद्यांना अटक केली. ते मूळचे तेलंगणाचे रहिवासी असून त्यांना १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. कोरेगाव – भीमा घटनेनंतर पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये झालेल्या हिंसाचारात त्यांचा सहभाग असल्याचा संशय

Related posts

सचिन वाझेंच्या चौकशीसाठी CBIला दिली परवानगी

News Desk

ऑपरेशन क्लिनअप – भाग २ सुरू ! पोलीस आयुक्त हेमंत नगराळे ‘ऍक्शन मोड’मध्ये

News Desk

अनिल देशमुखांना आणखी एक धक्का, ED ने टाकली निकटवर्तीयाच्या घरावर धाड

News Desk