HW News Marathi
मुंबई

सिद्धिविनायक मंदिरातील कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर…

मुंबई | मुंबईचे आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायक मंदिरातील कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे. सिद्धिविनायक मंदिरात १० वर्षांपेक्षा अधिक काळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम स्वरुपी करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे विद्यमान अध्यक्ष आदेश बांदेकर हे यासाठी पाठपुरावा करत होते. या पाठपुराव्याला यश आल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने सिद्धिविनायक मंदिराच्या कर्मचाऱ्यांना गणपती बाप्पा पावले असेच म्हणावे लागेल.

गतवर्षापासून बांदेकर मंदिर कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासाठी पाठपुरावा करत होते. सिद्धिविनायक मंदिर न्यासाने शासनाला पाठवलेला आकृतीबंध अखेर मंजूर करण्यात आला आहे. सिद्धिविनायक मंदिरातील एकूण १३३ कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. सिद्धिविनायक कर्मचाऱ्यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांची आभार मानले आहेत. गतवर्षी बांदेकर यांची मंदिर ट्र्स्टच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे. तसेच हल्लीच बांधेकर यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देखील देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याशिवाय शिवसेनेने बांदेकर यांच्याकडे सचिवपदाची जबाबदारीही दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबईतील चौपाट्या आता लवकरच होणार चकाचक

swarit

मोबाइल सावरताना आईने चिमुरडीला दहाव्या मजल्यावरून पाडले

News Desk

महाराष्ट्रातील आकडा ६३ वर, गर्दी कमी न झाल्यास लोकल सेवा बंद करावी लागेल- आरोग्यमंत्री

swarit
मुंबई

Live Updates | नरेंद्र मोदी मुंबई दौरा

News Desk

  • लोक तंत्र अमर रहे, लोक तंत्र अमर रहे, लोक तंत्र अमर रहे, लोक तंत्र अमर रहे | पंतप्रधान
  • आम्ही संविधानाच्या रक्षणासाठी पावलं उचलतो | पंतप्रधान
  • आमच्या सरकारने संसदेत संविधान दिन साजरा केला | पंतप्रधान
  • काँग्रेसच्या काळात किशोर कुमार यांच्या गाण्यावर बंदी होती | पंतप्रधान
  • आपल्या देशात तळागाळात असलेल्या प्रत्येकाला आपल्याला सोबत घेऊन जायचे आहे. देशातल्या महिलांना संविधानात समान हक्क बहाल करण्यात आला आहे | पंतप्रधान
  • कॉंग्रेसला लोकशाहीच्या ताकदीचा अंदाज नाहीये | पंतप्रधान
  • मीडियासाठी राजीव गांधी यांनी कोणता कायदा आणला ते सर्वांना माहिती आहे | पंतप्रधान
  • संविधानाच्या ६० व्या वर्षानिमित्त मी आंबारीतून संविधान ठेऊन यात्रा काढली होती. तेव्हा मी मुख्यमंत्री होतो. तरुणांमध्ये संविधानाप्रती आस्था निर्माण व्हावी म्हणून हा उपक्रम राबविला होता | पंतप्रधान
  • कॉंग्रेसमुळे न्यायव्यवस्था धोक्यात आली | पंतप्रधान
  • घटनेप्रती आस्था असायला हवी | पंतप्रधान
  • आणीबाणीमुळे संपूर्ण देशच कारागृह | पंतप्रधान
  • स्वार्थासाठी पक्षाचेही तुकडे केले गेले | पंतप्रधान
  • एका परीवारासाठी संविधानाचा दुरुपयोग झाला | पंतप्रधान
  • संविधानाचा चुकीचा वापर त्यावेळी करण्यात आला | पंतप्रधान
  • पंतप्रधान मोदींचा आणीबाणी, लोकशाहीवर संवाद | पंतप्रधान
  • आणीबाणीा हा लोकशाहीचा काळा दिवस | पंतप्रधान

मुंबई | भाजपाच्या वतीने आज आणीबाणी विरोधात देशभर काळा दिवस पाळणार आहे. ४३ वर्षांपूर्वी म्हणजे 25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादली होती. इंदिरा गांधी यांचा हा निर्णय देशातील लोकशाहीवरील घाला होता, अशी टीका करत आज आणीबाणी विरोधात भाजपा काळा दिवस पाळणार आहे.

त्यावेळी आणीबाणीविरोधात लढलेल्या कार्यकर्त्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि लोकशाही मूल्यांची चर्चा करण्यासाठी भाजपाने देशभरात ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासह भाजपाचे अनेक नेते सहभाग घेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत.

मुंबई भाजपाने आयोजित केलेल्या आणीबाणीविरोधी कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. तर अहमदाबादमध्ये आयोजित कार्यक्रमात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह संबोधित करणार आहेत. आणीबाणी दरम्यान, लाखो लोकांना त्यावेळी तुरुंगात टाकण्यात आले होते तसेच माध्यमांवर बंदी आणण्यात आली होती.

Related posts

ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत

News Desk

या सरकारला गरिबांच्या आयुष्याची किंमतच नाही

News Desk

ओम पुरी यांना विविध मान्यवरांची श्रद्धांजली

News Desk