HW News Marathi
मुंबई

सरकार उलथविण्याचा माओवाद्यांचा होता कट

मुंबई| देशभरात कथित माओवाद्यांवर करण्यात आलेल्या कारवाईचे समर्थन करताना पोलिसांनी माओवाद्यांचा सरकार उलथविण्याचा मोठा डाव होता असा गौप्यस्फोट केला आहे. शुक्रवारी मुंबईत पोलीस महासंचालक परमवीर सिंग यांनी पत्रकार परिषदेत हा गौप्यस्फोट केला आहे. सदर पत्रकार परिषदेत पोलीस महासंचालकांनी ज्यांना अटक करण्यात आली आहे त्या संदर्भातील विविध पुरावे प्रसार माध्यमांसमोर ठेवले आहेत.

पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये तेलुगू कवी वरवरा राव, अरूण परेरा, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा आणि वर्नण गोन्साल्विस यांना अटक करण्यात आली आहे. ही अटक अत्यंत योग्य होती. पण सर्वोच्च न्यायालयाने त्यांना नजरकैदेत ठेवण्याचा आदेश दिला, असेही यावेळी बोलताना पोलीस महासंचालक परमवीर सिंग यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले.

बंदी असलेल्या नक्षली संस्थांशी संबंध ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी देशभरात नऊ ठिकाणी छापेमारी केली आहे. या छापेमारीमध्ये हजारो संशयित कागदपत्रे, कंप्युटर्स आणि लॅपटॉप पासवर्डसह ताब्यात घेण्यात आले असून त्यांची फॉरेन्सिक तपासणी सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महापालिकेविरोधात त्वरित फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा !

News Desk

हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

News Desk

पश्चिम रेल्वेकडे सहा नवी सेगवे वाहने, सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल

News Desk