HW News Marathi
मुंबई

Breaking News | सायन रुग्णालयात एका गोविंदाचा मृत्यू

मुंबई | मुंबईमध्ये सायंकाळपर्यंत ६० गोविंदा जखमी झाल्याची माहीती प्राप्त झाली आहे. तसेच एका गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. २७ वर्षीय अंकुश खंदारे असे तरुणाचे नाव आहे. धारावीत थर रचताना चक्कर आल्याने कुश पडला. त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरु होते. इतर ४० जणांवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

दोन सुरक्षारक्षकांनी केला पाच वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

News Desk

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

swarit

डान्स बारचा धंदा सर्वत्र तेजीत

News Desk
मनोरंजन

आगमन बाप्पाचे | यंदा ‘चायना मेड’ सजावट साहित्याने दुकाने सजली

News Desk

धनंजय दळवी| अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गौरी-गणपतीसाठी दादरमधील विविध ठिकाणी सजावट साहित्याने दुकाने सजली असून यंदा त्यावरही “चायना मेड’ वस्तूंचा दबदबा दिसून येत आहे. मंदिरापासून ते मोत्याच्या माळा, इलेक्‍ट्रीक वस्तूंपर्यंत सारे काही “चायना मेड’ असल्याचे पहायला मिळत आहे.

आकर्षक दिसणाऱ्या आणि स्वस्त असल्याने या वस्तूंकडे ग्राहक आकर्षित होत आहेत. सजावट साहित्यामध्ये एलईडी दिव्यांच्या माळा, झुंबर, रंगीबेरंगी पताका व अन्य इलेक्‍ट्रिक आकर्षक साहित्य बाजारात झळकत आहेत. चायना मालाच्या तुलनेत स्वदेशी माल टिकाऊ आणि चांगला आहे. मात्र चायना मालाच्या तुलनेत स्वदेशी बनावटीच्या वस्तूंचा दर जास्त असल्याने ग्राहक चायना मालच जास्त खरेदी करत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

प्लॅस्टिक बंदीमुळे साहित्य महागले

महाराष्ट्र सरकारने पर्यावरण प्रदूषण कमी करण्यासाठी प्लॅस्टिक व थर्माकॉल बंदीचा निर्णय यावर्षी घेतल्याने प्लास्टिक, थर्माकॉल वापरावर मर्यादा आल्या आहेत. प्लॅस्टिक बंदीमुळे यावर्षी विक्रीसाठी लाकडी मखर आणि इतर साहित्य आले आहे. लाकडी साहित्य महाग असल्याने ग्राहकांचा म्हणावा तसा यावर्षी प्रतिसाद मिळत नाही. या सणादरम्यान प्लॅस्टिक बंदी शिथिल करण्याची मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.

गौरी व गणपती सजावटीसाठी लागणाऱ्या सजावट साहित्यात थर्माकॉलचा वापर थांबल्यामुळे बाजारात लाकडी सजावट साहित्य आले आहे. लाकडी साहित्य महाग असल्याने गौरी, गणेश भक्तांना यावर्षी जादा पैसे मोजावे लागत आहेत. प्लॅस्टीक आणि थर्माकॉल बंदी असली तरी काही साहित्य थोड्याफार प्रमाणात आजही दिसत आहे.

Related posts

सुपरस्टार राजेश खन्नांची १० सुपरहिट गाणी

News Desk

नाताळ आणि शुभेच्छापत्रे…

News Desk

नेहरु सेंटरमध्ये निसर्ग चित्रांचे प्रदर्शन

News Desk