HW News Marathi
मुंबई

आरोग्यमंत्र्यांनी दिली कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांची आकडेवारी

मुंबई | महाराष्ट्रात सध्या कोरोनाबाधितांची संख्या ३२० वर पोहोचली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच, एकूण ३९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असल्याची आनंदाची बातमीही त्यांनी दिली. आता एक चिंताजनक बातमी आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील ५ हजार जणांना क्वॉरंटाईन केल्याची माहिती त्यांनी दिली आहे. हे सर्वजण कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. मुंबईच्या कोरोना वॉर रुमला भेट दिल्यानंतर त्यांनी ही माहिती देत ट्विटही केले. मुंबईत सर्वाधिक म्हणजे १६७ रुग्ण आहेत आणि ही अत्यंत चिंतेची बाब आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या लोकांची संख्या ५३४३ एवढी आहे. या सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आले असून त्यांचीही चाचणी केली जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. मुंबईत ५ सरकारी आणि ७ खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोनाची चाचणी केली जात आहे. एका दिवसाला २ हजार चाचण्या केल्या जाण्याची क्षमता सध्या मुंबईत आहे. याशिवाय अतिरिक्त मास्क आणि व्हेंटिलेटर्सचीही तयारी केली जात आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सतीश शेट्टी खून प्रकरणाची श्वेतपत्रिका काढावी आरटीआय अ‍ॅक्टिव्हिस्ट फोरमची मागणी

News Desk

मुंबई भाजपाची निवडणुक समिती जाहीर

News Desk

एलफिस्टन आणि करी रोड पुल फेब्रुवारी महिन्यात खुला

swarit