HW News Marathi
मुंबई

सीएसएमटी जवळील हिमालय पादचारी पूल दुर्घटना, ‘रेड सिग्नल’मुळे जीवितहानी टळली

मुंबई | छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील असलेल्या ‘हिमालय’ पादचारी पुलाचा स्लॅब कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेवेळी सीएसएमटीसमोरील रस्त्यावरील सिग्नलमुळे मोठी जीवितहानी टळली. ही दुर्घटना घडली त्यावेळी रस्त्यावर ‘रेड सिग्नल’ लागल्याने पुलाखालील वाहने नव्हती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

जर यावेळी रेड सिग्नल लागलेला नसता तर या पुलाखालून वाहनांची वर्दळ ही सुरू असती तर तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती, असे मत प्रवाशांनी व्यक्त केले आहे. सायंकाळच्या वेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते.
या पुलाखालून जे जे फ्लायओव्हरकडे रस्ता जातो. दुर्घटना घडली त्यावेळी या पुलाखालून एकच टॅक्सीचालक त्याची गाडी उभी होती. सुदैवाने पुलाचा स्लॅब त्याच्या टॅक्सीच्या समोरील भागावर कोसळला आणि टॅक्सीचालक बचावला.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कंगना विरोधात दाखल करण्याचे आदेश, धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप

News Desk

कोस्टल रोडवरील पुलाच्या दोन पिलरमधील अंतर दुप्पट करण्याचा निर्णय; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Aprna

मालगाडी घसरल्याने नाशिक, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा

News Desk