HW News Marathi
मुंबई

मुंबईतील गारवा होणार १५ दिवसांसाठी गायब 

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. तर मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुंबईकरांना गारवा जाणवत आहे. पण, हा गारवा आता १५ दिवसांसाठी गायब होणार आहे. थंडीसाठी मुंबईकरांना १५ दिवस वाट पहावी लागणार आहे. असे स्कायमेटने म्हटले आहे.

रविवारी मुंबईचे तापमान १७ डिग्री सेल्सिअसपर्यंत घसरले होते. या मोसमातले हे सर्वात कमी तापमान होते. त्यानंतर सोमवारी आणखी १ डिग्रीने खाली आहे. पण ही थंडी नसून केवळ गारवा असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. उत्तरेकडून मुंबईच्या दिशेने थंड वारे वाहत आहेत. त्यामुळे मुंबईचे तापमान घसरल्याचे स्कायमेटने म्हटले आहे. प्रत्यक्षात मात्र मुंबईत थंडी २१ डिसेंबरनंतर येण्याची शक्यता असल्याचे स्कायमेटकडून माहिती देण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जाहिरनामा समितीच्या पहिल्या बैठकीनंतर मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांची माहिती

News Desk

इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा विजय असो | राज ठाकरेंची टिप्पणी

News Desk

पुण्यात मुख्यमंत्र्यांची पारदर्शी सभा – सोशल मिडीयावर सभेबाबत उलटसुलट चर्चा

News Desk