HW News Marathi
मुंबई

जेएनयूतील घोषणाबाजीच्या वादावेळी मी तिथे नव्हतोच | कन्हैय्या कुमार

मुंबई | मी कधीही देशविरोधी घोषणा दिलेली नाही, असे सांगत जवाहरलाल नेहरू विद्यालयाच्या विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष आणि विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार यांनी आपल्यावरील आरोपांचे खंडण केले. मुंबई येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांच्यावर जेएनयूमध्ये भारताचे तुकडे तुकडे होतील अशी घोषणा दिल्याचा आरोप केला गेला होता. त्याविषयी बोलताना, ‘देशविरोधी घोषणा देताना जर मी कोणाला पाहिले तर मीच त्यांना रोखेन. तसेच जेएनयूतील घोषणाबाजीच्या वादाच्या वेळी मी तिथे नव्हतोच’, असेही ते म्हणाले.

जेएनयूमध्ये अफजल गुरुचा स्मृतीदिन साजरा केला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. देशातील बेरोजगारीसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावरून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न आहे अशी टीकाही त्यांनी केली. त्याचप्रमाणे मोदी सरकारचा राफेल करार प्रचंड खर्चिक असून सरकारने त्याची किंमत जाहीर करावी अशीही मागणी त्यांनी यावेळी केली. केंद्रातील सरकारकडे महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत, असा आरोपही यावेळी त्यांनी केला. देशातील लोकशाही संकटात आहे तसेच देशात चुकीच्या पद्धतीने प्रचार केला जात आहे, असेही ते म्हणाले.

विरोधकांचे विचार जसे असतील तसेच भाष्य ते करणार, असा टोलाही त्यांनी लगावला. देशातील अनेक घटकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगत त्यांनी देशातील पत्रकारांवर असणाऱ्या दबावाचा उल्लेख केला. त्याचप्रमाणे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांच्यावर केलेल्या राष्ट्रविरोधी असल्याच्या आरोपाचाही उल्लेख करत त्यांनी अशा मानसिकतेबद्दल चिंता व्यक्त केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी सतर्क राहवे – जिल्हाधिकारी अरुण डोंगरे

News Desk

भांडुपमध्ये सार्वजनिक शौचालय खचले, दोन जणांचा मृत्यू

swarit

मुंबईसह उपनगरात पावसाची दमदार हजेरी

News Desk
राजकारण

शिवसेना आमदार विजय औटी यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड

News Desk

मुंबई | विधानसभेच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेचे आमदार विजय औटी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गेल्या चार वर्षांपासून हे पद रिक्त होते. विधानसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतून काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे आमदार विजय औटी यांची बिनविरोध निवड झाली आहे.

सध्या विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे हरिभाऊ बागडे आहेत. विधानसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे २९ नोव्हेंबरला सकाळी ११.४५ वाजेपर्यंत विधानमंडळाच्या प्रधान सचिव यांच्या दालनात सादर करण्यास सांगितले होते. यावेळी शिवसेनेचे विजय औटी, काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांचे अर्ज दाखल करण्यात आले होते.

Related posts

अर्थसंकल्पात महिलांसाठी ‘या’ आहेत मोठ्या घोषणा

Aprna

“…सत्तेशिवाय समोरासमोर या”, संजय राऊतांचे शिंदे गटाला आव्हान

Aprna

Shekhar Gore Exclusive | मला आताच आमदार झाल्यासारखं वाटतंय !

News Desk