HW News Marathi
मुंबई

मुंबईच्या उच्चभ्रु वस्तीत नपुंसकता वाढली

मुंबई- उच्चभ्रु समजल्या जाणा-या मलबार हिल परिसारत मोठ्या प्रमाणात नपुंसकतेचे प्रमाण वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नपुंसकतेमुळे गेल्या ५ वर्षात ३२ हजारांहून अधिक कृत्रिम गर्भधारणा करण्यात आल्याचा अहवाल आहे. बदलती जीवन शैली, लग्न होण्यास होणारा विलंब, पती-पत्नीने एकमेकांना पुरेसा वेळ न देणे आदी कारणामुळे नैसर्गिकरित्या गर्भधारणा होण्याचे प्रमाण कमी होत आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार २०१२ मध्ये ३,९६१ कृत्रिम गर्भधारणा झाल्या होत्या. २०१६ मध्ये ही संख्या ८, ३१३ एवढी होती. आजच्या तरूणांची जीवन शैली पूर्णपणे बदलली आहे. खाणं-पिणं वेळेत नसणे आणि धुम्रपानाच्या सवयीमुळे शुक्राणूंवर वाईट परिणाम होतो. परिणामी त्यांना कृत्रिम पद्धतीने गर्भधारणेकडे वळावे लागत असल्याचे स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. रेखा डावर यांनी सांगितले. काळानुसार शरीरात बदल होतो. उशिराने लग्न झाल्यास शारिरीक व्याधी वाढण्याची शक्यता असते. त्यातच वजन वाढल्यास नैसर्गिकरित्या गर्भधारणा होण्यास अडचणी निर्माण होतात, असेही तज्ज्ञांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुरजी पटेल यांच्या उमेदवारी अर्जावर ठाकरे गटाचा आक्षेप

Seema Adhe

‘देशमुखांच्या अडचणीत आणखीनच वाढ,’ काटोल आणि वडविहिरातील निवासस्थानी ईडीचा छापा!

News Desk

आम्ही काय सतरंज्या उचलायच्या का; कार्यकर्त्याचा अजित पवारांना सवाल

News Desk
Uncategorized

आता घाटी रुग्णालयात तीन बालकांचा मृत्यू

News Desk

औरंगाबाद-येथील घाटी रुग्णलायतील प्रसूती विभागात रविवारी रात्री तीन बालकांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी नातेवाईकांना गोरखपूर घटनेची आठवण झाली. मृत बेगमपुरा स्मशानभूमीत सोमवारी सकाळी सहा वाजता एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. ही विदारक घटना पाहून रोज सरणाची व्यवस्था करणाऱ्या स्मशानजोगीच्याही डोळ्यात पाणी आले.

रविवारी मृत्युमुखी पडलेल्या तीन बालकांत दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. माया मुकेश मगरे (३०, रा. ब्रिजवाडी), पूजा पांडुरंग बखले (रा. डोंगरगाव, ता. अंबड), अर्चना विनायक मुंढे (३०, रा. धावणी मोहल्ला) अशी मृत्युमुखी पडलेल्या नवजात शिशूंच्या आईची नावे आहेत. विनायक मुंढे (३६) त्याची पत्नी अर्चना हिला रविवारी सातच्या सुमारास अचानक कळा येऊ लागल्या. त्याने तिला तत्काळ घाटीतील प्रसूती विभागात दाखल केले. सात वाजून ४० मिनिटांनी अर्चना प्रसूत झाली. मात्र मुलगा झाला आहे की मुलगी हे त्याला कोणीच सांगितले नाही. पुरुषांना प्रसूती विभागात प्रवेश नसल्यामुळे त्याला बाहेरच थांबावे लागले. अखेर सकाळी सहा वाजता विनायकच्या हातात मृत बाळ ठेवण्यात आले. माझ्या बाळाचा मृत्यू कशामुळे झाला? असे तो घाटीतील कर्मचाऱ्यांना विचारत होता. मात्र, त्याला उत्तर मिळाले नाही. काही मुले जन्मल्यानंतर केवळ पंधार मिनिटे जगतात, असे डॉक्टरांनी सांगितले.

Related posts

आता सेल्फी विथ काऊ

News Desk

शिवसेनेच्या बैठकीचं पत्र सरन्यायाधीश Dhananjay Chandrachud यांनी मराठीतून वाचून दाखवलं

News Desk

राष्ट्रगीतासाठी उभे राहण्यात काय गैर: गौतम गंभीर

News Desk