HW News Marathi
मुंबई

मुंबईच्या उच्चभ्रु वस्तीत नपुंसकता वाढली

मुंबई- उच्चभ्रु समजल्या जाणा-या मलबार हिल परिसारत मोठ्या प्रमाणात नपुंसकतेचे प्रमाण वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नपुंसकतेमुळे गेल्या ५ वर्षात ३२ हजारांहून अधिक कृत्रिम गर्भधारणा करण्यात आल्याचा अहवाल आहे. बदलती जीवन शैली, लग्न होण्यास होणारा विलंब, पती-पत्नीने एकमेकांना पुरेसा वेळ न देणे आदी कारणामुळे नैसर्गिकरित्या गर्भधारणा होण्याचे प्रमाण कमी होत आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार २०१२ मध्ये ३,९६१ कृत्रिम गर्भधारणा झाल्या होत्या. २०१६ मध्ये ही संख्या ८, ३१३ एवढी होती. आजच्या तरूणांची जीवन शैली पूर्णपणे बदलली आहे. खाणं-पिणं वेळेत नसणे आणि धुम्रपानाच्या सवयीमुळे शुक्राणूंवर वाईट परिणाम होतो. परिणामी त्यांना कृत्रिम पद्धतीने गर्भधारणेकडे वळावे लागत असल्याचे स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. रेखा डावर यांनी सांगितले. काळानुसार शरीरात बदल होतो. उशिराने लग्न झाल्यास शारिरीक व्याधी वाढण्याची शक्यता असते. त्यातच वजन वाढल्यास नैसर्गिकरित्या गर्भधारणा होण्यास अडचणी निर्माण होतात, असेही तज्ज्ञांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केईम रुग्णालयाचे छत कोसळून रुग्ण किरकोळ जखमी

News Desk

धर्मा प्रोडक्शनच्या गोदामाला मध्यरात्री भीषण आग

News Desk

डोंबिवलीमध्ये शारदा प्रोसेस कंपनीच्या चार मजली गोदामाला आग

News Desk