HW News Marathi
मुंबई

मुंबईत कांद्याचे दर घसरले, कांद्याची आवक वाढली

मुंबई | हिवाळा सुरू झाल्यापासून मुंबईमध्ये भाजीपाल्याचे दर घसरू लागले आहेत. त्यामुळे कोबी, वांगी, फ्लॉवर उत्पादक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहेत. यामध्ये आता कांदा उत्पादकांची देखील भर पडली आहे. सध्यामध्ये मुंबई बाजार समितीमध्ये रोज १००० ते ११०० टन कांदा आवक होत आहे.

उन्हाळी कांदा २ ते ६ रुपये किलो दराने विकला जात आहे. चांगला बाजारभाव मिळेल या आशेने चाळींमध्ये ठेवलेल्या मालाचे दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. नवीन मालाला १३ रुपयांपर्यंत दर मिळत आहे. बटाट्याचे दरही होलसेल मार्केटमध्ये ७ ते १८ रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

सद्य:स्थितीमध्ये साडेसात लाख जुडी पालेभाज्या व २३०० टन भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये होत आहे. फळ मार्केटमध्ये सरासरी १३०० टन कृषी मालाची आवक होत असून, कलिंगड व मोसंबीची सरासरी २५० टन आवक होत आहे. कलिंगड ७ ते ११ रुपये किलो विक्री होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

News Desk

मुंबईकरांचे पाणी महागले

News Desk

ऑनलाईन माहिती भरण्याची कामे आऊटसोर्सिंग करा

News Desk
राजकारण

#MarathaReservation : मराठा आरक्षणाला पुन्हा आव्हान, रिट याचिका दाखल

News Desk

मुंबई | ‘इंडियन कॉन्स्टिट्युशनॅलिस्ट कौन्सिल’ या संस्थेतर्फे अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या कायद्याला आव्हान देणारी रिट याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. राज्यात दिले गेलेले ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण हे रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन असल्याने बिगरमागासवर्गीय घटकांवर ते अन्याय करणारे ठरते, असा आक्षेप या याचिकेत करण्यात आला आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींव्यतिरिक्त ‘ओबीसीं’ना दिलेले आरक्षण सामाजिक मागासलेपणावरच दिलेले आहे. त्यामुळे त्याच निकषावर मराठा समाजाचा स्वतंत्र वर्ग करणे घटनाबाह्य आहे, असाही आक्षेप या याचिकेत घेण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे, सरकारने ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देणे हे घटनाबाह्य आहे, असे सांगत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी देखील मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेद्वारे सदावर्ते यांनी मराठा समाजाचे आरक्षण रद्द करण्याची मागणी केली आहे. याचिका दाखल केली जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याचप्रमाणे प्रत्यक्षात याचिका दाखल केल्यानंतर अ‍ॅड. जयश्री पाटील व त्यांचे पती अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना धमक्यांचे तब्बल १५०हूनही अधिक फोन आले आहेत. हे सर्व फोन या दाम्पत्याने टॅप करून ठेवले आहेत. या सर्व धमक्या सकल मराठा समाज आंदोलनाच्या कार्यकर्त्यांकडून आल्याचा आरोप अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला.

दरम्यान, राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणासाठीची संवैधानिक आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली असून या विधेयकाचे कायद्यात रूपांतर करण्यात आले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा कायदा म्हणजेच १ डिसेंबर २०१८ पासून संपूर्ण राज्यभरात लागू करण्यात आला आहे. मराठा समाजाला १६ टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर झाला आहे. परंतु तरीही कोणत्याही संस्था, संघटनकडून न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली जाऊ शकते ही बाब लक्षात घेता राज्य सरकारकडून सोमवारी (३ डिसेंबर) सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आले आहे.

Related posts

राज्यातील हे ‘स्थगिती सरकार’ फार काळ टिकणार नाही !

News Desk

#RamMandir : …तर दिल्लीपासून काबूलपर्यंत दंगली घडवू !

News Desk

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उद्ध्वस्त धर्मशाळेतून बरेच लोक भाजपच्या पक्क्या घरात प्रवेश !

News Desk