HW News Marathi
मुंबई

पुणे सदाशिव पेठेत 8 दुचाकी गाड्या जाळल्या

पुणे सदाशिव पेठे परिसरातील रसत्यावर लावण्यात आलेल्या दुचाकी गाडयांना अज्ञातानी आग लावून जाळून टाकल्याची घटना घटली आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे घडली आहे, याघटनेत आठ गाड्या जाळून खाक झाल्या आहे. धुराच्या लोटांमुळे एल. आय सी कर्मचा-याच्या र्इमारतीतील लोकांना जाग आली व हा प्रकार उघडकीस आला. यानंतर तातडीनं अग्निशमक दलाला पाचारण करण्यात आले. तोपर्यंत या दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या होत्या. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस अधिक तपास करत आहेत. सोसायटीबाहेर लावलेल्या दुचाकी पेटून देण्याचे प्रकार शहरात मोठया प्रमाणात वाढले आहे. अशा गुन्ह्याचा तपास करणे पोलिसांसमोर आव्हान आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Breaking News | सायन रुग्णालयात एका गोविंदाचा मृत्यू

News Desk

एटीएसने कांदिवलीतून ८ बांगलादेशीना अटक

News Desk

मराठा आरक्षण अहवाल १५ नोव्हेंबरला सादर होणार, पुढील सुनावणी १० सप्टेंबरला

News Desk