HW News Marathi
मुंबई

बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची रेस्क्यू टीम अवनीच्या शोधात

मुंबई | पाच वर्षीय वाघीण अवनीला ठार केल्यावर, तिच्या ११ महिन्यांच्या दोन बछड्यांना जेरबंद करण्यासाठी वनविभागाने सात पथकांची नेमणूक केली आहे. यातच बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रेस्क्यू टीम अवनी वाघीणीच्या बछड्यांचा शोध घेणार आहे. यासाठी ही टीम १५ नोव्हेंबरला यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवड्याला रवाना झाली आहे.

लोणीच्या जंगलात असलेल्या बेस कॅम्पमधुन ही शोधमोहीम राबविली जात आहे. पथकाने सराटी, बोराटी, वरुड आणि भुलगड आदी भागांतील जंगल परिसर पिंजून काढला, परंतु दोन बछडे अद्यापही शोधपथकाच्या दृष्टीस पडले नाहीत. प्रधान मुख्य वनसंरक्षक ए. के. मिश्रा हे मध्यंतरी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात भेट देउन चर्चा केली. वरिष्ठांच्या आदेशावरून ही शोधमोहीम सुरू असल्याची माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने दिली आहे. १०० किलोमीटर परिघात हे जंगल पसरले आहे. बछडे आढळुन आल्यास त्यांना बेशुध्द करुन जेरबंद करण्यात येइल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई विमानतळावर मेगाब्लॉक, तिकीट दरावर होणार परिणाम

News Desk

उल्हासनगरमध्ये वेश्या व्यवसाय चालणाऱ्या लॉजवर धाड, तिघांना अटक

News Desk

शिवसेना नेते सचिन सावंत यांची गोळ्या झाडून हत्या

News Desk