HW News Marathi
मुंबई

मुंबईतील सभेत ओवैसींवर चप्पल फेकली

मुंबई | एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसींवर मुंबईतील नागपाडा येथील सभेत चप्पल फेकण्याची घटना घडली आहे. ओवैसी यांनी तीन तलाक विरोधात बोलत असताना, त्यांच्या दिशेने कोणीतरी चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला. यानंतर सभेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे ओवैसींनी तात्काळ भाषण थांबवले.

तीन तलाक विधेयक संसदेत रखडल्यामुळे निराश लोकांकडून हा हल्ला झाला असून सरकारच्या तीन तलाक हा निर्णय मुस्लीमांनी स्वीकारला नाही. पण, मी लोकहितासाठी लढणारा नेत आहे. अशाप्रकारे द्वेष करणाऱ्या माणसांना मी घाबरत नाही. अशा हल्ल्यांनी माझा आवाज दाबला जाऊ शकत नाही’ असे बोलून ओवैसींनी पुन्हा भाष सुरु केले.

ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी सभेत तात्काळ बंदोबस्त वाढवून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. पण, ओवैसींवर कोणी चप्पल फेकली हे अद्याप ही समजू शकलेले नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे, वाहतुकीसाठी बंद

News Desk

लोकल ठप्प, एक्स्प्रेसही रोखल्या, विद्यार्थ्यांचा ठिय्या

News Desk

आज मध्य रेल्वेसह हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

News Desk
राजकारण

गरीबांना अजून गरीब आणि श्रीमंतांना श्रीमंत करणे ही भाजपची नीती | अजित पवार

News Desk

गरीबांना अजून गरीब करणे आणि श्रीमंतांना श्रीमंत करणे ही भाजपची नीती आहे. त्यामुळे अशा पक्षांना बाजुला करण्याचे काम आपल्या सर्वांना करायचे आहे, असे आवाहन विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी मंठा येथे बोलताना केले. हल्लाबोल आंदोलनातील जाहीर सभेत ते बोलत होते.

राज्यात ९ हजार गावे ५० पैशापेक्षा कमी आणेवारीवाली आहेत. त्यातील पाच हजार गावे मराठवाड्यातील आहेत. पण भाजपचे सरकार आल्यापासून त्यांच्या मंत्र्यांना शेतकरी आणि कामगारांच्या जीवनात काहीच बदल करता आलेला नाही. भाजपच्या मंत्र्यांनी केवळ जॅकेटची फॅशन आणली, असा खोचक टोमणा त्यांनी त्यांनी सरकारला मारला.

शिवसेना किंवा त्यांच्या प्रमुखांना शेतीतले काय कळते? फक्त शिवाजी महाराजांचे नाव घेऊन यांनी सत्ता मिळवली. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काहीही काम केलेले नाही. या नाकर्त्या लोकांना बाजुला करण्यासाठी हे हल्लाबोल आंदोलन आहे, असे ते म्हणाले.

जालना जिल्ह्यात स्व. अंकुशराव टोपे यांनी सहकारी संस्था उत्तमरित्या चालविण्याचा आदर्श घालून दिला. राजेश टोपे त्यांच्याप्रमाणेच संस्थेचे काम पाहत आहेच. पण जालन्यातील इतर नेत्यांनी मात्र संस्था विकून खाल्ल्या, असे म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले की मंठा-परतूर मतदारसंघात होत असलेली सभा ही अभूतपूर्व अशीच म्हणावी लागेल. खाली-वर, इकडे-तिकडे कुठेही नजर मारली तर माणसंच माणसं दिसत आहे. घराच्या छपरावर बसूनही लोक सभेला उपस्थित आहेत. त्यामुळे ‘हवा का रुख बदल गया है’ हेच या सभेचे समर्पक वर्णन करता येईल.

भाजपच्या काळात अनेक मोठ मोठे उद्योग बंद होत आहेत. लोकांचे रोजगार जात आहेत. करोडो रुपये जाहीरातीवर खर्च करुन लोकांना फसवण्याचे काम भाजपने केले आहे. त्यामुळे भाजपचे ‘भारतीय जाहीरात पार्टी’ असे आता भाजपचे नामकरण करायला हवे, अशी टीका आमदार राजेश टोपे यांनी केली.

खरीप हंगामासाठी जालना जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता. पण अद्याप पिक विम्याचे पैसे मिळालेले नाहीत. जर लवकर पैसे नाही मिळाले, तर आम्ही हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा काढू, असा इशारा त्यांनी दिला.

मंठा येथील हल्लाबोल सभेला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विधीमंडळ गटनेते जयंत पाटील, माजी मंत्री आ राजेश टोपे, आ. सतीश चव्हाण, आ. अमरसिंह पंडित, आ. अॅड. जयदेव गायकवाड, आ. विक्रम काळे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, ओबीसी सेलचे राज्यप्रमुख ईश्वर बाळबुधे, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे राज्यप्रमुख डॉ नरेंद्र काळे, प्रदेश सरचिटणीस बसवराज नागराळकर, प्रदेश उपाध्यक्ष गुलाबराव गावंडे, विजय बोराडे, विलासराव लांडे उपस्थित होते.

Related posts

फडणवीस सरकारने धनगर समाजाला फसविले | सुप्रिया सुळे

News Desk

सत्तास्थापनेसाठी कुमारस्वामींच्या आमदारांना लाच देण्याची भाजपची नवीन खेळी

News Desk

“मी कधीच माघार घेत नाही”, जितेंद्र आव्हाडांची ठाम भूमिका

Aprna