HW News Marathi
मुंबई

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल तब्बल अर्धा उशिराने

मुंबई | मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईकरांच्या कामाला जाण्याच्या, गर्दीच्या वेळी कल्याण-डोंबिवली दरम्यान वाहतूक विस्कळीतची माहिती मिळत आहे. कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकांवर सध्या प्रचंड गर्दी असून कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या गाड्या तब्बल अर्धा उशिराने धावत आहेत. मुंबईकरांच्या कामावर जायच्या वेळी वारंवार होणारा मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा नक्कीच त्रासदायक आहे. दरम्यान, वाहतूक विस्कळीत होण्यामागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पेट्रोल ४ रुपयांनी होणार स्वस्त

News Desk

“सी वॉर्ड” मध्ये स्वच्छता अभियानाची रॅली

Gauri Tilekar

राणेंची जागा नक्की कुठे – रावसाहेब दानवे सांगतील का?

News Desk
मुंबई

मुंबई विमानतळावर मेगाब्लॉक, तिकीट दरावर होणार परिणाम

News Desk

मुंबई | मुंबई विमानतळावरील धावपट्टीच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे. आजपासून म्हणजेच ७ फेब्रुवारी ते ३० मार्चंपर्यंत हे काम चालणार असून या कामामुळे धावपट्टी ६ तासांसाठी बंद राहणार आहे. आठवड्यातून मंगळवार, बुधवार आणि शनिवारी असे तीन दिवस काम केले जाणार आहे. या दिवशी सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत विमानांचे उड्डाण तसेच लँडिंग होणार नाही. परिणामी तिकीट दरात ५० टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे. दरम्यान, २१ मार्चनंतर वाहतूक पूर्ववत होईल.

मुंबई विमानतळ हे सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक आहे. दिवसाचे सहा तास वाहतूक बंद राहणार असल्याने दिवसभरात वाहतूक अत्यंत कमी होणार आहे. याच कारणामुळे तिकीटदरात वाढ होईल. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकमेकांना भेदणाऱ्या दोन धावपट्ट्या आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दोन धावपट्ट्या जिथे जुळतात, त्याच भागात दुरुस्तीचे काम होणार आहे. यामुळे दोन्ही धावपट्ट्या बंद ठेवाव्या लागणार आहेत.

मुंबई विमानतळावर दर तासाला ४६ विमाने ये-जा करतात. म्हणजेच एका दिवसात २७६ विमानांवर दुरुस्तीचा परिणाम होणार आहे. मुंबईच्या दुसऱ्या विमानतळाच्या जलद निर्मितीची मागणी पुन्हा होऊ लागली आहे. मुंबईसाठी दुसरे विमानतळ व्हावे ही मागणी २००० सालापासून होत आहे.

Related posts

पनवेलमध्ये वैदू नगर झोपडपट्टीला आग

News Desk

थुंकण्यासाठी बाहेर डोकावताना दोन मुलांचा तोल जाऊन मृत्यू

News Desk

हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये ‘हेरिटेज वॉक’ सुरू

Aprna