HW News Marathi
मुंबई

परकीयांना भारतीय मिरचीची भूरळ

मुंबईः भारतातून विविध देशांत होणाऱ्या मसाले निर्यातीत गेल्या एप्रिल-जूनदरम्यान ३५ टक्क्यांनी वाढ नोदंवण्यात आली आहे. निर्यात होणाऱ्या मसाले पदार्थ्यांच्या मूल्यात २ टक्क्यांनी वाढ होऊन ती ४५.८९ अब्ज रुपयांवर पोहचल्याची माहीती मसाले महामंडळाने दिली आहे. दरम्यान, मसाले पदार्थांच्या निर्यातीत मिरचीने आघाडी घेतली आहे.यंदा (२०१७-१८) पहिल्या तिमाहीत मिरचीच्या निर्यातीत ७५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा देशातून एकूण १,३३,००० टन मिरचीची निर्यात झाली आहे. मसाले निर्यात करणारा भारत हा जगातील सर्वांत मोठा अाहे. देशातून मिरचीसह, जिरा, हळद, वेलदोडे, लसूण, काळी मिरी, मेथी अादी मसाल्यांची निर्यात केली जाते. मुख्यतः भारतीय मसाल्यांना अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, व्हिएतनाम, सौदी अरेबिया, श्रीलंका, नेदरलॅंड, जपान, स्वीडन,कॅनडा, इराण, अाॅस्ट्रेलिया, इटली, चीन, थायलंड, बांगलादेश अादी देशांतून मागणी अाहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

खातूंची कार्यशाळा आता नव्या जागेवर

swarit

मोनो रेल ऑगस्टमध्ये धावणार

News Desk

रामदास आठवले लोकसभा निवडणूक मुंबईतून लढणार

News Desk
महाराष्ट्र

महाराष्ट्रात फटाके बंदी झाल्यास कोट्यवधींची उलाढाल ठप्प होणार

News Desk

मुंबईः सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील वाढत्या प्रदूषणावर चिंता व्यक्त करत दिवाळीत फटाके विक्रीस बंदी घातली आहे. या निर्णय़ाचे अनेकांनी स्वागत केले तर काहींनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, महाराष्ट्रात देखील पर्यावरणाचा प्रश्न गंभीर असून दिवाळीत फटाके विक्रीस बंदी घालण्याचा प्रस्ताव पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी ठेवला आहे. मुख्यमंत्र्यांना प्रस्तावर सादर केल्यांतर फटाकेबंदीवर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास दिल्लीपाठोपाठ महाराष्ट्रातही फटाके बंदी लागु होऊ शकते. दरम्यान, असे झाल्यास फटाके कारखानदारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

Related posts

ठाकरे सरकारची शेतकरी कर्जमाफी २ लाखापर्यंत, जाणून घ्या काय आहे ‘अध्यादेश’

News Desk

राहुल गांधींच्या कारवाईवर ‘मविआ’च्या आमदारांचे तोंडावर काळयापट्टया बांधून मूक आंदोलन

Aprna

‘देवेंद्र फडणवीसांचं मानसिक संतुलन बिघडले’, भाई जगताप यांची टीका

News Desk