HW News Marathi
मुंबई

प्रदूषणमुक्त हरित दिवाळीसाठी रहिवाशांचा पुढाकार

रुपेश दळवी

मुंबई उच्च न्यायालय आणि राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने फटाक्यांची विक्री आणि वापरावर आणलेल्या निर्बंधांनंतर काही प्रमाणात सामान्य नागरिकही याला पाठिंबा देत आहेत. फटाक्यांच्या दुष्परिणामांबद्दल झालेल्या जनजागृतीमुळे फटाक्यांचा वापर कमी होत आहे. मुंबईत चांदिवली भागातील नाहर अम्रितशक्ती या सोसायटीमधील रहिवाशांनी हरित दिवाळीचा संदेश दिला आहे. यावेळी रहिवाशांनी यंदाची दिवाळी फटाके न फोडता प्रदूषणमुक्त साजरी करण्याचे आवाहन सर्वांना केले आहे.

फटाक्यांच्या विक्रीवर निर्बंध लावल्यामुळे जवळपास देशभरातील 8 लाख कामागारांचा रोजगार हिरावला जात आहे. अशातच प्रदूषणाचा मुद्दाही नजरेआड करता येत नाही अशा प्रतिक्रिया सर्व स्तरांतून उमटत आहेत. अशातच वायूप्रदूषण व ध्वनी प्रदूषण रोखण्याचा हेतू असल्याचे इथल्या रहिवाशांनी सांगितले. यावेळी नाहर अम्रितशक्ती सोसायटीतील जवळपास शेकड़ो रहिवाशी या पुढाकारात सहभागी झाले होते. प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी व्हावी अशी आमची इच्छा आहे. हरित दिवाळीचा हा संदेश आम्हाला केवळ आमच्या सोसायटीकरता न ठेवता संपूर्ण शहराला याबाबत जागरूक करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे रहिवासी रूपल बोके यांनी सांगितले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पहिल्या पावसात मुंबईकरांची तारांबळ उडाली, मध्य-पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk

महापौरांचा मुख्यमंत्र्यांवर पावसाळी घणाघात

swarit

HW EXCLUSIVE : पोलीस भरतीत शक्तीवर्धक इंजेक्शनचा बोलबाला; मुंबईतील चाचणी डोपिंगच्या विळख्यात?

Chetan Kirdat