HW News Marathi
मुंबई

जय जवान गोविंदा पथकाची मुख्यमंत्र्यांना अनोखी सलामी

ठाणे | ठाण्याच्या स्वामी प्रतिष्ठानने यंदा पहिल्यांदाच दहीहंडी लावली आहे. चक्क २५ लाख रुपयांचे पारीतोषिक असलेल्या या दहीहंडीला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी खडे ९ थर लावून जय जवान गोविंदा पथकाने मुख्यमंत्र्यांना अनोखी सलामी दिली.

स्वामी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी पाटील तसेच प्रतिष्ठानने दत्तक घेतलेल्या आदिवासी मुलींनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. स्वामी प्रतिष्ठान तर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५ लाख रुपये केरळ पुरग्रस्तांसाठी प्रदान करण्यासाठी देण्यात आले. तर २ लाख रुपयांचा धनादेश आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी देण्यात आला.

सर्वाधिक थर रचणा-या गोविंदा पथकाला लाखो रुपयांची घसघशीत बक्षीस दिले जाणार असून उत्सवातील एकूण बक्षिसाची रक्कम ही ५० लाख रुपये ठेवण्यात आली आहेत. यंदा ठाण्यात सर्वाधिक बक्षिसांचे वाटप या उत्सवात होण्याची चिन्हे आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह भाजपचे निम्मे अधिक मंत्री आणि नेते या उत्सवात हजेरी लावणार आहेत तर सिने नाट्य सृष्टीतील कलाकारांची हजेरी या दहीहंडीच विशेष आकर्षण असून अभिनेत्री केतकी चितळे हिने येथे नुकतीच हजेरी लावली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार, तिन्ही मार्गावरील रेल्वेची वाहतूक उशीरने सुरू

News Desk

प्रत्यारोपणासाठी ‘यकृताचा’ ठाणे ते दादर लोकलप्रवास

News Desk

कामगारांना संघटनांना विश्वासात घ्या; एसटीचा संप मिटवा!: विखे पाटील

News Desk