HW News Marathi
मुंबई

कल्याणच्या कृष्णकुंज सोसायटीत झाला विवेकी विचारांचा जागर

मुंबई | समाजाला अंधश्रद्धामुक्त करण्यासाठी यावर्षी विविध गणेशमंडळात अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यक्रम उत्साहाने पार पडत आहेत. भुत भानामती, करणी, चेटूक नाटूक हे सारे कसे थोतांड आहे ह्याचा उलगडा करून चमत्काराच्या मागे असलेला वैज्ञानिक दृष्टीकोन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते भविकांसमोर मांडत आहेत. श्रद्धा असण्यास काही हरकत नाही पण अंधश्रद्धा नसावी हा संदेश जागोजागी देत भविकांसमोर श्रद्धा व अंधश्रद्धा यांचा उलगडा अंनिसची ही युवक मंडळी करत आहे.

स्रिया व अंधश्रद्धा, फलज्योतिष यांसारख्या विषयाला हात घालून आपल्या संतांची शिकवण काय आहे आणि आपण वागतो कसे यांवर शाहिर स्वप्नील शिरसाठ यांनी ठिकठिकाणी भाविकांना मार्गदर्शन केले. ह्या गणपती उत्सवात कल्याण, पनवेल, भांडुप, बदलापूर, शहापूर अशा विविध ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यक्रम सादर करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला निमंत्रित करण्यात येत आहे आणि त्याच अनुषंगाने जागोजागी प्रबोधनपर कार्यक्रम सादर होत आहेत.

शाहिर राजेंद्र कोळी, स्वप्निल शिरसाठ व टीम परिवर्तनचे रोहीत जगताप, सागर वाळके, संकेत जाधव, अनिकेत चांदुरे, भुषण राजेशिर्के, अविनाश पाटील हे आदिवासी पाडे, शाळा, महाविद्यालयात, गावागावात जाऊन समाजाला अंधश्रद्धेपासून मुक्त करण्यासाठी झटत आहेत. कल्याण मधील कृष्णकुंज सोसायटीत गणेशोत्सवानिमित्ताने प्रबोधनाचा १५० वा कार्यक्रम नुकताच सादर झाला. या कार्यक्रमात जादूटोणा विरोधी कायद्याची माहिती लोकांना देण्यात आली. समाजात कुठेही बुवाबाजी चालत असेल तर त्याला आपण कशाप्रकारे थांबवु शकतो ह्याची सर्वतोपरी माहिती देखील कार्यक्रमात देण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फेरीवाल्यांविरुद्ध लढण्यापेक्षा सीमेवर जाऊन लढा. –रामदास आठवले

News Desk

मोनोरेलने गाठला १ सप्टेंबरचा मुहूर्त

Gauri Tilekar

क्रॉफर्ड मार्केटच्या दुसऱ्या टप्प्यातील पुनर्विकास कामाला गती मिळणार   

Gauri Tilekar