HW News Marathi
मुंबई

लता मंगेशकर यांच्या नावाने लाखोंचा गंडा

मुंबई गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची बनावट सही करुन लोकांना लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी रेवती खरे या महिला विरोधात गावदेवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आला आहे.

रेवती खरे यांनी लता मंगेशकरांच्या नावानं बनावट निमंत्रणपत्रिका आणि लेटरहेड तयार केरून अनेक कार्यक्रमांमध्ये पत्रिका वाटायच्या, आणि लोकांकडून आर्थिक मदत घेत होती. एका व्यक्तीने लतादीदींना फोनवर माहिती दिल्यावर सर्व प्रकार उघडकीस आला. याप्रकऱणी गावदेव पोलिसांनी गुन्हा दाखल करून रेवती खरेची शोध घेत आहेत. रेवती खरे ही नालासोपारा येथे राहाणारी असून सध्या ती फरार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

लेट लथिफ मुंबई विद्यापीठ -210 परिक्षांच्या निकालासाठी 45 दिवस

News Desk

बी.डी.डी. चाळीच्या पुनर्विकासांतर्गत पोलिसांना केवळ १५ लाख रुपयांमध्ये मालकी हक्काची घरे

Aprna

महापालिका, जि.प. आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले

News Desk
शिक्षण

सम्यक विद्यार्थी संघटनेची मुंबई विद्यापीठात निदर्शने

News Desk

मुंबई | विश्व विद्यालय अनुदान आयोग बरखास्त करण्याच्या केंद्र सरकार च्या निर्णया निषेधार्थ सम्यक विद्यार्थी आंदोलन या विद्यार्थी संघटनेच्या वतीने मुंबई विद्यापीठा समोर तीव्र निदर्शने करण्यात आली. विश्व विद्यालय अनुदान आयोग बरखास्त न करता त्या मध्येच आवश्यक सुधारणा करण्यात याव्या अशी मागणी करत सम्यक विद्यार्थी संघटनेच्या शिष्टमंडळाने केंद्रीय शिक्षण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याद्वारे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु यांना निवेदन देण्यात आले.

प्रस्तावीत उच्च शिक्षण आयोगामध्ये अनेक त्रुटी असून सदर उच्च शिक्षण समितीतील सदस्यांची नेमणुक केंद्र सरकार करत असल्याने मोठ्या प्रमाणात नोकरशाह आणि राजकारण्यांचा यामध्ये हस्तक्षेप राहणार असून सदर समितीला मुक्तपणे काम करता येणार नाही. या उलट सरकारधार्जीन ही समिती राहणार असुन पुर्णता केंद्र सरकारच्या प्रभावाखाली उच्च शिक्षण समिती राहील. उच्च शिक्षण ओयोग गठीत करण्याचा निर्णय हा शिक्षण व्यवस्थेला एककेंद्रीकरणाचा असून हा निर्णय सरकारने एकाधिकारशाहीने घेतला आहे. असा अारोप सम्यक विद्यार्थी संघटनेचे मुंबई अध्यक्ष अक्षय गुजर यांनी केला.

विश्व विद्यापीठ अनुदान आयागाचे आर्थिक अधिकारांची स्वायत्ता काढुन ते केंद्र सरकारकडे राहणार असल्याने महाविद्यालयांना अनुदान देताना निपक्षपातीपणाचा या ठीकाणी लवलेश ही राहणार नाही असे मत मुंबई सचिव आकाश दोडके यांनी मांडले.

त्याचप्रमाणे यापुर्वी महिविद्यालयांना संलग्नता देण्याचे अधिकार राज्यांना होते. परंतु सलंग्नता आता थेट उच्च शिक्षण आयोगाकडून मिळवावी लागणार. सदर अटी केवळ एककेंद्रीकरण दर्शवते असे मत सम्यक विद्यार्थी संघटनेचे प्रतीक साबळे(ठाणे अध्यक्ष) यांनी व्यक्त केले.

Related posts

सीबीएसईचा निकाल ८३.०१ टक्के 

News Desk

तुमच्या पगारापेक्षा बाराशेपट अधिक पगार घेतात सीईओ

News Desk

शास्त्रीय कला , चित्रकला व लोककला सहभाग घेणा-या विद्यार्थ्यांना वाढिव गुण देणार :  राज्य शिक्षण मंडळ  

News Desk