HW News Marathi
मुंबई

Mumbai Dongri Building Collapsed : मनपा चालवणारे निर्लज्जम् सदा सुखी आहेत !

मुंबई | डोंगरीत ४ मजली केसरबाई इमारतीचा निम्मा भाग कोसळला असून या दुर्घटनेत आतापर्यंत या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तर ३० पेक्षा जास्त जण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची प्रथमिक माहिती मिळाली आहे. “मनपा चालवणारे निर्लज्जम् सदा सुखी आहेत, राज्य सरकारच्या पुनर्विकासासंदर्भातील उदासीनतेमुळे मुंबई वारंवार इमारत कोसळ्याच्या दुर्घटना घडत असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेता धनंजय मुंडे यांनी केला आहे.” मुंडे यांनी घटनास्थळी जावून या घटनेची पाहाणी केली.

“मनपा चालवणारे निर्लज्जम् सदा सुखी आहेत. डोंगरी भागातली केसरबाई ही इमारत धोकादायक असल्याची तक्रार वारंवार केली गेली, मात्र भसम्या झाल्यागत भ्रष्टाचारी महानगरपालिकेला पैसे गिळण्याशिवाय वेळ मिळाला तर ते लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष देईल ना!”, मुंडे यांंनी त्यांच्या ट्वीटर हँडलवरून पालिकेवर टीकास्त्र सोडले आहे.

केसरबाई ही इमारत १०० वर्षे जुनी असून म्हाडाच्या अखत्यारीत येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या इमारतीत जवळपास १५ कुटुंब राहत होती. ही इमारत रहिवाशांंनी पुर्नर्विकासाठी बिल्डरला दिली होती. परंतु बिल्डरने पुर्नविकासाचे काम वेळात सुरू केले होते की नाही, याची चौकशी केली जाईल,

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरण; आदित्य ठाकरेंचा निकटवर्तीय पोलिसांच्या ताब्यात

News Desk

राष्ट्रपतींचा उपयोग शून्य – राज ठाकरेंचं वादग्रस्त वक्तव्यं

News Desk

जगंली हत्ती गैरव्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना कर्नाटकात प्रशिक्षण

News Desk