HW News Marathi
मुंबई

मुंबईत मुसळधार पाऊस, अतिवृष्टीचा इशारा

मुंबई । सलग दुसऱ्या दिवशी राज्यभरात पावसाची संततधार सुरू आहे. यांचा परिणाम रेल्वे सेवेवर झाला असून मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव प्रवाशांना होणारा त्रास टाळण्यासाठी मेन, मध्य आणि हार्बर मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली आहे. तर ट्रान्स आणि चौथ्या मार्गावरील खारकोपरकडील वाहतूक सुरळीत असल्याची माहिती मध्य रेल्वेने त्यांच्या ट्वीटर हँडलवरून सांगितले आहे.

कुर्ला, सायन, सांताक्रूझ भागातील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. जोरदार पावसाचा परिणाम लोकल सेवेवरही झाला आहे. हार्बर मार्गावरची रेल्वेसेवा बंद करण्यात आली आहे. वाशी ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक बंद करण्यात आली आहे. कल्याण, अंबरनाथ, बदलापूर या भागातही सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे परिणामी याचा लोकलसेवेवर परिणाम झाला आहे. बदलापूर आणि कल्याणमध्ये रेल्वे ट्रॅकवर पाणी आले. त्यामुळे अंबरनाथमधून कर्जतकडे जाणारी लोकल वाहतूक सध्या बंद आहे.

रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुलुंडमध्ये वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. आताही मुलुंडमध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे. सायनच्या गांधी मार्केटमधल्या रस्तावर पाणी साचले. सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी वाहतूक बंद केली आहे.

हावामान खात्याकडून मुंबईकरांना सर्कतेचा इशारा

पुढील काही तास मुंबईत अतिवृष्टी कायम राहील. दुपारनंतर समुद्रामध्ये ४.५ मि. हायटाईड असल्याने मिठी नदीची पाण्याची पातळी वाढेल. मुंबईकरांनी गरज नसेल तर घराबाहेर पडू नये असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईजवळ जहाजावरील तीन खलाशांचा मृत्यू

News Desk

भाजपचं सरकार गेलं तरच अच्छे दिन: अजित पवार

News Desk

शनिवारी रात्री पासून मेगा ब्लॉक

News Desk