HW News Marathi
मुंबई

गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित

नवी दिल्ली | आंध्र प्रदेशमधील टीडीपी आणि वायएसआर कॉँग्रेस तसेच टीआरएस सदस्यांनी सोमवारी लोकसभेचे प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळे सुरूवातीला दुपारी १२ पर्यंत कामकाज स्थगित करण्यात आले. त्यानंतर कामकाजास सुरूवात होताच पुन्हा विरोधी पक्षांच्या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत (दि.२०) स्थगित करण्यात आले. तर दुसरीकडे राज्यसभेतही विरोधी पक्षाच्या गोंधळामुळे कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आले. त्यामुळे मोदी सरकारवर अविश्वास प्रस्ताव दाखल करता आला नाही.

टीडीपी, वायएसआर काँग्रेस आणि टीआरएसचे सदस्य ‘वी वाँट जस्टिस’ च्या घोषणा देत होते. पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनीही घोषणाबाजी केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या दुसऱ्या टप्प्याचे कामकाज सुरू झाल्यापासून लोकसभेच्या कामकाजात पीएनबी घोटाळा, आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या तसेच तेलंगणातील आरक्षणाच्या मागणीवरून रोज अडथळे येत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

युती तुटल्यास शिवसेनेला ‘दे धक्का’साठी भाजपाची रणनीती

News Desk

गांजाची होते फ्री होम डिलिव्हर!

News Desk

आज मध्यरात्रीपासून आंतरराज्यीय विमान सेवा बंद

swarit