HW News Marathi
मुंबई

‘त्या’ पाचही मुली सापडल्या…

मुंबई | कुलाबा परिसरात राहणाऱ्या 5 शाळकरी मुली शुक्रवारपासून बेपत्ता होत्या. कालपासून बेपत्ता असलेल्या पाचही मुलींना शोधण्यात कुलाबा पोलिसांना यश आले असून कालपासून या मुलींनी मरीन ड्राइव्ह ते ठाणे आणि ठाण्यापासून पुन्हा कुर्ला असा प्रवास केल्याचे उघड झाले आहे.

फोर्ट विभागात असलेल्या कॉन्व्हेंट स्कुलमध्ये आठवीच्या वर्गात या मुली शिकत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. परीक्षेचा निकाल आल्यानंतर कमी मार्क्स मिळाले म्हणून त्या शाळेतून घरी परत न येता मरीन ड्राइव्ह ला गेल्या तिथून पुन्हा हँगिंग गार्डन आणि नंतर ठाणे असा प्रवास केला असल्याचे उघडकीस आले आहे.

शनिवारी दुपारी त्यांना कुर्ला रेल्वे स्थानकावर ट्रेनची वाट पाहत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले.

या मुली शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत घरी परतल्या नसल्याने मुलींच्या पालकांनी लगेच कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार मुंबईतल्या सगळ्या पोलीस ठाण्यात या मुलीचे फोटो व्हायरल करण्यात आले होते. तसेच मुली सापडल्यास कुलाबा पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले होते. पोलिसांच्या पथकांनी शोध घेतला असता कुर्ला येथून या मुलींना ताब्यात घेण्यात आलेे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबई महापालिकेच्या व्हर्च्युअल क्लासरुमच्या निविदेतील भ्रष्टाचाराची चौकशी करा! – आशिष शेलार

Aprna

आयसीआसीआय बँकेच्या संचालक आणि सीओओ पदावरुन चंदा कोचर यांची उचलबांगडी

News Desk

बंदमुळे जो भडका उडाला, सुप्रीम कोर्ट आणि शासन जबाबदार

News Desk
शिक्षण

आर.एम.भट हायस्कूल शताब्दी सोहळा साजरा

News Desk

मुंबई | परळ येथील आर.एम. भट हायस्कूलला रविवार, 2 सप्टेंबर रोजी शंभर वर्षे पूर्ण झाले. या निमित्ताने शनिवारी, 1 सप्टेंबरला शाळेचा शताब्दी सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, गोखले एज्युकेशनचे सचिव एम. एस. गोसावी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

लालबाग-परळसारख्या कामगार विभागातील कित्येक पिढ्यांना ज्ञानदान करणारे गोखले एज्युकेशन सोसायटीचे आर.एम.भट हायस्कूल स्वातंत्र्यपूर्व काळात 1917 साली सुरू झाले. या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ‘गुरूदक्षिणा माजी विद्यार्थी संघ’ स्थापन केला असून या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून शाळेत विविध उपक्रम राबविले जात आहे. यंदा शाळेच्या शंभर वर्षानिमित्त सर्व माजी विद्यार्थी तसेच शाळेने मिळून एका विशेष सोहळ्याचे आयोजन केले होते. जास्तीत जास्त आजी-माजी विद्यार्थी, पालकांनी या कार्यक्रमाला उपस्थित दर्शवली होती. यावेळी आवाहन गुरूदक्षिणा माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षा प्रतिमा जोशी तसेच मुख्याध्यापिका जी. एस. कांबळे देखील उपस्थित होत्या.

फळ्याच्या काळ्या रंगाने आयुष्यात प्रकाश पाडला – उद्धव ठाकरे

आर.एम.भट हायस्कूलच्या शताब्दी सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी फळ्याचा रंग बदलला तरी शाळेचे शिक्षण तेच राहणार आहे. आणि काळ्या रंगाचे फळे हिरवे झाले असले तरी काही लोक काळ्या रंगाच्या फळ्यांना अशुभ मानायचे, पण याच काळ्या रंगाने आपल्या सर्वांच्या आयुष्यात प्रकाश पडला आहे. असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावर केले.

परळ विभागातील जुन्या संस्थांचा सत्कार

कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते परळ विभागातील जुन्या संस्थांचा आर.एम. भट शाळेच्या वतीने गौरव करण्यात आला. यात वैद्यकीय, शैक्षणिक, कला आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक नामांकित संस्थांचा समावेश होता. तसेच विविध क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करणाऱ्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचाही ‘आर.एम.भट रत्न’ या पुरस्काराने याप्रसंगी सन्मान करण्यात आला.

Related posts

सचिन साबू यांना अमेरिकेतील सर्वोच्च बहुमानाचा सन्मान

News Desk

महिला वॉर्डननेच केला विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार

swarit

बारावी परीक्षेचा उद्या निकाल

News Desk