HW News Marathi
मुंबई

‘त्या’ पाचही मुली सापडल्या…

मुंबई | कुलाबा परिसरात राहणाऱ्या 5 शाळकरी मुली शुक्रवारपासून बेपत्ता होत्या. कालपासून बेपत्ता असलेल्या पाचही मुलींना शोधण्यात कुलाबा पोलिसांना यश आले असून कालपासून या मुलींनी मरीन ड्राइव्ह ते ठाणे आणि ठाण्यापासून पुन्हा कुर्ला असा प्रवास केल्याचे उघड झाले आहे.

फोर्ट विभागात असलेल्या कॉन्व्हेंट स्कुलमध्ये आठवीच्या वर्गात या मुली शिकत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. परीक्षेचा निकाल आल्यानंतर कमी मार्क्स मिळाले म्हणून त्या शाळेतून घरी परत न येता मरीन ड्राइव्ह ला गेल्या तिथून पुन्हा हँगिंग गार्डन आणि नंतर ठाणे असा प्रवास केला असल्याचे उघडकीस आले आहे.

शनिवारी दुपारी त्यांना कुर्ला रेल्वे स्थानकावर ट्रेनची वाट पाहत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले.

या मुली शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत घरी परतल्या नसल्याने मुलींच्या पालकांनी लगेच कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार मुंबईतल्या सगळ्या पोलीस ठाण्यात या मुलीचे फोटो व्हायरल करण्यात आले होते. तसेच मुली सापडल्यास कुलाबा पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले होते. पोलिसांच्या पथकांनी शोध घेतला असता कुर्ला येथून या मुलींना ताब्यात घेण्यात आलेे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मानखुर्द येथे दोन वर्षीय चिमुरड्याचा नाल्यात पडून मृत्यू

swarit

धारावी पुनर्विकास प्रकल्पात आता राज्य सरकारचा सहभाग

Gauri Tilekar

माटुंगा किंग्ज सर्कल येथे चालत्या बसने घेतला पेट

News Desk