HW News Marathi
मुंबई

लॉटरी व्यवसायिकांचा आंदोलनाचा इशारा

मुंबईः शासनाने लॉटरी व्यवसायासाठी 28 टक्के जीएसटी लागु केल्याने हा व्यवसाय संकटात सापडला आहे. पूर्वी तीन ते चार टक्के कर भरणाऱ्या लॉटरी व्यवसायिकांमुळे यामुळे कु-हाड आली आहे. अनेकांनी हा व्यवसाय बंद केला आहे. या व्यवसायातून राज्यशासनाला कोट्यवधींचा महसूल मिळतो. परंतु कर वाढवल्यामुळे हा महसूल सध्या बंद झाला आहे. तसेच तीन ते चार हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगाराची कु-हाड कोसळली आहे. तरी या विरोधात आवाज उठवण्यासाठी येत्या 21 रोजी आझाद मैदानावर राज्यातील सर्व लॉटरीचालक आंदोलन करणार आहेत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

उल्हासनगरच्या बारमध्ये स्थानिक गुंडाचा धुडगूस, बार व्यवस्थापकासह वेटरला बेदम मारहाण

News Desk

म्हाडाच्या घरांसाठी आज सोडत

News Desk

जोगेश्वरीत म्हाडाच्या इमारतीला भीषण आग

News Desk
देश / विदेश

जलप्रलयातही देशप्रेम अबाधित!

News Desk

गुवाहाटी : दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत काल झालेले स्वातंत्र्यदिनाचे दिमाखदार कार्यक्रम आपण पाहिले. मात्र आसाममधील लहानशा शाळेसारखा सोहळा काल कुठेही झाला नसेल. पूरपरिस्थितीने वेढलेल्या आसाममध्ये चक्क गुडघाभर पाण्यात उभे राहून शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी ध्वजारोहण आणि ध्वजवंदन केले. जलप्रलयातही अबाधित राहिलेले हे देशप्रेम सध्या सोशल मिडियावर कौतुकाचा विषय ठरत आहे.

आसाममधील ढुबरी जिल्ह्यात फकीरगंज पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नसकारा सरकारी शाळेतील हे छायाचित्र असून येथील सहायक शिक्षक मिजानूर रहमान यांनी त्यांच्या फेसबुक प्रोफाइलवर टाकल्यानंतर काही तासांतच ते तब्बल ६० हजार जणांनी शेअर केले. सोशल मिडियावर मिळालेल्या या प्रतिसादाबद्दल रहमान यांनी देशवासियांचे आभार मानले आहेत. या निमित्ताने आसामसारख्या दुर्गम भागातील समस्यांना वाचा फुटल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. ‘आम्हाला पायाभूत सुविधांपासूनही वंचित राहावे लागते. वीजेची समस्याही मोठी आहे. हा फोटो शेअर केल्यानंतर लगेचच माझ्या मोबाइलची बॅटरी संपली आणि चार्ज करायला वीजही नव्हती. रस्ते आणि दळणवळणाच्या अन्य सुविधाही येथे आवश्यक प्रमाणात उपलब्ध नाहीत. याकडे शासनाने लक्ष पुरवावे,’ असे रहमान यांनी म्हटले आहे.

Related posts

अयोध्या प्रकरणी आजपासून नियमित सुनावणी

News Desk

२०१९मध्ये भारतात ११० वाघांचा तर ४९१ बिबट्यांचा मृत्यू, डब्ल्यूपीसीआयचा रिपोर्ट

News Desk

कुलभूषण जाधव यांना वकिल देण्यास लाहोरच्या बार कौन्सिलचा नकार

News Desk