HW News Marathi
Covid-19

राज्यात कोरोनाचा उद्रेक! ! नव्या रूग्णांची संख्या ६० हजारांच्या पार

मुंबई | राज्यात कोरोनाचा २०२० पेक्षा अधिक उद्रेक २०२१ मध्ये पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात रोज ५० हजारांच्या पुढे नवे कोरोना रूग्ण आढळत आहेत. आज राज्यातील कोरोना रूग्ण संख्येने मोठी उडी मारली आहे. एकूण ६३,२९४ नवे रूग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात पहिल्यांदा ६० हजारांच्या पुढे रूग्ण संख्या गेल्याने आणखी चिंता वाढली आहे.

तसेच, ३५,००८ रूग्ण बरे होऊन घरी गेले असून३४९ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. आज वाढलेला हा आकडा धडकी भरवणारा आहे. दरम्यान, राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगीतले आहे. अर्थात अजून निर्णय झाला नसला तरी त्या संदर्भात बैठका सूरू असून लवकरच निर्णय देण्याची शक्यता आहे.

 

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची प्रतिक्रिया

“रेमडीसीवीर इंजेक्शन तुटवड्यामुळे केंद्र शासनाने त्याची निर्यात थांबविण्याचा जो निर्णय घेतला आहे तो स्वागतार्ह असून त्यामुळे गरजू रुग्णांना वेळेवर रेमडेसीवीर उपलब्ध होण्यास मदत होईल. महाराष्ट्रातील रेमडीसीवीरचा तुटवडा लक्षात घेऊन या इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी आणावी, अशी मागणी मी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सांगली जिल्ह्यात रिकव्हरी रेट वाढतोय – जयंत पाटील

News Desk

ग्रामीण भागातील जनतेने मनरेगाच्या रोजंदारीचा लाभ घ्यावा, रोहयो मंत्री संदिपानराव भुमरे यांचे आवाहन

News Desk

राज्यातील लघु उद्योगांना पॅकेजची तयारी अंतिम टप्प्यात । उद्योगमंत्री

News Desk